शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

‘स्वाभिमान’ निवडणूक रिंगणात असेल, पण कुठे अन् किती जागा हे नंतरच कळेल : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 2:32 PM

पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे ...

ठळक मुद्देनेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे - नारायण राणे शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम - नारायण राणे

पंढरपूर : स्वाभिमान पक्ष आगामी निवडणूक लढविणार आहे़ मात्र किती जागा आणि कोणत्या ठिकाणच्या जागा हे नंतरच कळेल, असे सांगून खा़ नारायण राणे यांनी उत्सुकता कायम ठेवली आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ़ भारत भालके, संयोजक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, नीलम राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, राजूबापू पाटील, माजी आ़ शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर, नगरसेवक चेतन नरोटे, संतोष पाटील, प्रतिभादेवी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शहाजी साळुंखे, विठ्ठलचे संचालक महादेव देठे, कॉँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नागेश फाटे, नारायण मोरे, सुरेश देठे आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो, विविध खात्यांचे मंत्री होतो. लोकांची अहोरात्र कामे केली़ कोकणातून सहा वेळा निवडून आलो़ सातव्या वेळी पुन्हा निवडून येणार असे वाटत होते, मात्र पराभूत झालो. सुशीलकुमार शिंदे हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनीही विविध खात्यांचे मंत्रीपद भूषविले़ इतकेच नाही तर केंद्रातही ऊर्जामंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले़ जनतेची कामे करूनही आम्हाला पराभूत का व्हावं लागतं हो ? असा सवाल करीत नेत्यांनीही जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेने नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे़ त्यांना सुखी ठेवणे हे सरकारचे काम आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असो़ परंतु नेत्यांच्या आश्वासनाने आणि घोषणेने त्यांचे पोट भरत नाही तर कृती केली पाहिजे़ शेतकरी विकासाचा घटक आहे, मात्र त्यांना सध्या दुष्काळात हालअपेष्टा करायला लावणे चुकीचे आहे़ सरकारने चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणत्याही नियम व अटीचे बंधन घालू नये़ जनावरांना चारा द्यायचाच असेल तर उदार मनाने द्यावे, असा सल्ला नारायण राणे यांनी सरकारला दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarayan Raneनारायण राणे Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक