शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सुशीलकुमारांनी इम्रानखानला ऑक्सिजन पुरविण्याचे काम केले : संबित पात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 17:27 IST

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्यावतीने सोलापुरात युवक प्रज्ञावंत कार्यक्रम

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्यावतीने सोलापुरात युवक प्रज्ञावंत कार्यक्रमजम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० या विषयावरील मेळाव्यात चर्चाशाहिस्तेखानला ऑक्सिजन  आणि दारुगोळा पुरविण्याचे काम सोलापूरचे माजी खासदार करीत आहेत

सोलापूर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यूएनजीएच्या बैठकीत बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. इम्रान खान यांना ऑक्सिजन  पुरविण्याचे काम केल्याबद्दल शिंदे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली. 

भाजपच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात शनिवारी सायंकाळी युवक प्रज्ञावंत कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर त्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० या विषयावरील मेळाव्यात चर्चा करण्यात आली. डॉ. पात्रा म्हणाले, यूएनजीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या विषयाचा उल्लेख केला नाही. कारण तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे संपूर्ण भाषण भारताच्या विषयावर होते. इम्रान खान आपल्या भाषणात म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात दहशतवादी तळ चालवित असल्याचे मत काँग्रेसच्या गृहमंत्र्याने व्यक्त केले होते. सुशीलकुमार शिंदे हे सर्व ऐकत असतील. महाराष्ट्र  ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. पण या भूमीतील नेत्याची वक्तव्ये शाहिस्तेखान वाचू लागले आहेत. शाहिस्तेखानला ऑक्सिजन  आणि दारुगोळा पुरविण्याचे काम सोलापूरचे माजी खासदार करीत आहेत. याबद्दल त्यांनी महाराष्ट्र ची माफी मागायला हवी. 

यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी देशात समान नागरी कायदा केव्हा येईल, असा प्रश्न विचारला. भाजप लोकशाही मार्गाने हा विषय पूर्ण करणार असल्याचे संबित पात्रा यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीने पक्षातून ३७० कलम हटविलेएक देश पण दोन प्रधान आणि दोन निशाण हे या देशात चालणार नाही, ही जनसंघ आणि भाजपची भूमिका राहिली आहे, असे सांगून संबित पात्रा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. पात्रा म्हणाले, राष्ट्रवादीत जे घडतेय तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. या पक्षात दोन झेंडे असतील, असे मत अजित पवार यांनी मांडले होते. पण एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशाण चालणार नाहीत, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. शरद पवारांनी आपल्या पक्षातून ३७० कलम हटविले आहे. पण त्यांचा पक्ष काश्मीरच्या ३७० कलम विषयापासून स्वत:ला दूर ठेवत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSambit Patraसंबित पात्रा