शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

युवकांकडून ‘पर्यावरण रक्षा, जगाची सुरक्षा’चा नारा

By appasaheb.patil | Published: July 01, 2019 5:03 PM

होटगी स्टेशन येथील तरूणांनी घेतली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी; स्वखर्चातून वृक्षलागवड

ठळक मुद्देवृक्षलगावड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजेसमाजाने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाचा नाश होणे थांबणार आहे़निसगार्तून माणसाला जिद्द, उत्साह मिळतो त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे पालकत्व घेऊन ते झाड मोठं केलं पाहिजे

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : वृक्षलगावड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. समाजाने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाचा नाश होणे थांबणार आहे. निसगार्तून माणसाला जिद्द, उत्साह मिळतो त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे पालकत्व घेऊन ते झाड मोठं केलं पाहिजे. निसर्गाला सोबत घेऊन चाललो तर मानवाची प्रगती नक्की होईल हेच उद्देश डोळ्यासमोर होटगी स्टेशन (ता़ द़ सोलापूर) येथील युवकांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन झाडे लावण्यास सुरूवात केली़ नुसती झाडेच नाही लावली तर ती झाडे कायमस्वरूपी टिकविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली शिवाय विकतचे पाणी आणून झाडांना जीवदान देण्याचा काम त्या युवकांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील २० ते २५ युवक एकत्र येऊन फेबु्रवारी महिन्यात ‘पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा’ या नावाने एक टीम तयार केली़ या टीमच्या माध्यमातून होटगी स्टेशन परिसरातील हनुमान मंदीर, भवानी मंदीर, उर्दू प्राथमिक शाळा, मुस्लिम कब्रस्थान, होटगी स्टेशन, सोलापूर रोड आदी भागात वृक्षलागवड केली.

एवढेच नव्हे हा उपक्रम सातत्याने पुढे असेच सुरू ठेवण्यासाठी आठवड्यातून प्रत्येक रविवारी वृक्षसंवर्धानाबरोबरच वृक्ष जोपासण्यासाठी टीममधील प्रत्येक युवकांनी जबाबदारी घेतली आहे़ हा स्तुत्य उपक्रम पाहून अनेक युवक आता या टीममध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येऊ लागली आहेत़ त्यामुळे वृक्षारोपन करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ याकामी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी सहकार्य करीत असल्याचे पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा या टिममधील युवकांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

गिफ्टच्या बदल्यात झाडहोटगी स्टेशन परिसरात एखाद्याचं लक्ष असेल किंवा वाढदिवस असेल तर पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा या टिमच्या माध्यमातून त्या नव्या वधुवरांना गिफ्ट न देता झाड देऊन ते झाड वाढेपर्यंतची जबाबदारी दिली जात आहे़ एवढेच नव्हे तर होटगी स्टेशन परिसरात होणाºया प्रत्येक कार्यक्रमात हार, तुरे, पुष्पगुच्छ आदी वस्तुने गौरव, सन्मान, सत्कार करताना अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे़ युवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे परिसरातील लोकांनी या युवकांच्या कामाचे कौतुक केले आहे़ हा उपक्रम असाच कायम सुरू राहणार असल्याचं मत युवकांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमानdroughtदुष्काळ