शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

ऊसक्षेत्राचा अंदाज नसल्याने राज्यातील गाळप हंगाम स्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:46 AM

राज्यात १०१ कारखाने सुरू; खाजगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करेनात

ठळक मुद्देकोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू

सोलापूर : डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही ऊस क्षेत्राचा अंदाज नसल्यामुळे राज्यातील साखर हंगामाने वेग घेतला नाही. आतापर्यंत १०१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. उसाच्या टंचाईमुळे सुरू होणाºया साखर कारखान्यांची संख्या यावर्षी कमीच राहणार असली तरी ती किती राहील?, याचा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाला अद्याप आलेला नाही.

परतीच्या पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरु राहिल्याने शिवाय दिवाळी व विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे यावर्षी साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी उशिराने मिळाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री गटाची बैठक होईल व साखर हंगामाला परवानगी मिळेल असे सांगितले जात होते; मात्र सरकार स्थापन होत नसल्याने २२ डिसेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.   बुधवारपर्यंत राज्यात १०१ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.  यामध्ये  सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. या कारखान्यांनी ६० लाख ८४ हजार मे.टन गाळप केले असून ५५.५१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

कोल्हापूर पट्ट्यात महापूर तर उर्वरित भागात दुष्काळाची झळ उसाला बसली आहे. त्यामुळे नक्की किती ऊस गाळपाला येणार?, याचा अंदाज साखर कारखानदारांना येत नसल्याने गाळप हंगाम सुरू करण्यास बहुतेक कारखानदार धजत नसल्याचे सांगण्यात आले. कारखाने सुरू करण्यामध्ये सहकारी कारखानदार आघाडीवर असून खासगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करीत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास वेग आलेला नाही.

कोल्हापूर, पुणे विभाग आघाडीवर

  • - कोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू झाले आहेत. सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
  • - अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. अमरावती विभागातील दोन कारखाने सुरू झाले असून नागपूर विभागातील एकही कारखाना अद्याप सुरू झालेला नाही.

नोंद अवघ्या सात कारखान्यांची - सोलापूर साखर उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील १५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन असे १८ कारखाने सुरू झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील ७ कारखान्यांनीच गाळप अहवाल पाठविला आहे. अन्य ११ कारखान्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. सुरू झालेल्या काही कारखान्यांना आजही पुरेसा ऊस मिळेल की नाही, याचा भरवसा नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती