शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

ऊसक्षेत्राचा अंदाज नसल्याने राज्यातील गाळप हंगाम स्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 10:48 IST

राज्यात १०१ कारखाने सुरू; खाजगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करेनात

ठळक मुद्देकोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू

सोलापूर : डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही ऊस क्षेत्राचा अंदाज नसल्यामुळे राज्यातील साखर हंगामाने वेग घेतला नाही. आतापर्यंत १०१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. उसाच्या टंचाईमुळे सुरू होणाºया साखर कारखान्यांची संख्या यावर्षी कमीच राहणार असली तरी ती किती राहील?, याचा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाला अद्याप आलेला नाही.

परतीच्या पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरु राहिल्याने शिवाय दिवाळी व विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे यावर्षी साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी उशिराने मिळाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री गटाची बैठक होईल व साखर हंगामाला परवानगी मिळेल असे सांगितले जात होते; मात्र सरकार स्थापन होत नसल्याने २२ डिसेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.   बुधवारपर्यंत राज्यात १०१ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.  यामध्ये  सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. या कारखान्यांनी ६० लाख ८४ हजार मे.टन गाळप केले असून ५५.५१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

कोल्हापूर पट्ट्यात महापूर तर उर्वरित भागात दुष्काळाची झळ उसाला बसली आहे. त्यामुळे नक्की किती ऊस गाळपाला येणार?, याचा अंदाज साखर कारखानदारांना येत नसल्याने गाळप हंगाम सुरू करण्यास बहुतेक कारखानदार धजत नसल्याचे सांगण्यात आले. कारखाने सुरू करण्यामध्ये सहकारी कारखानदार आघाडीवर असून खासगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करीत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास वेग आलेला नाही.

कोल्हापूर, पुणे विभाग आघाडीवर

  • - कोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू झाले आहेत. सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
  • - अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. अमरावती विभागातील दोन कारखाने सुरू झाले असून नागपूर विभागातील एकही कारखाना अद्याप सुरू झालेला नाही.

नोंद अवघ्या सात कारखान्यांची - सोलापूर साखर उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील १५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन असे १८ कारखाने सुरू झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील ७ कारखान्यांनीच गाळप अहवाल पाठविला आहे. अन्य ११ कारखान्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. सुरू झालेल्या काही कारखान्यांना आजही पुरेसा ऊस मिळेल की नाही, याचा भरवसा नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती