शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आध्यात्मिक;  संकष्टी चतुर्थी आणि मनशांती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:23 IST

कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

ठळक मुद्देउपवास असताना चुकून खाल्ले तरी पाप लागत नाही इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य !

चांद्र महिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर मंगळवार असेल तर ती संकष्टी चतुर्थी ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ समजली जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन सोडला जातो. काही लोक संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास करतात. उपवास सोडताना जास्त जेवण घेणे योग्य नसते.

माणसाने इतरांशी माणुसकीने वागावे हे महत्त्वाचे असते. गरीब गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी उपवास सोडताना दान करावयासही सांगण्यात आले आहे. मात्र पूजा-उपवास करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यावयाची असते. तसेच उपवास केल्यामुळे जर शरीराला त्रास होणार असेल तर उपवास केला नाही तरी चालतो. त्यामुळे पाप लागत नाही. उपवास असताना चुकून खाल्ले तरी पाप लागत नाही. परमेश्वर हा क्षमाशील आहे.

महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची साधीसोपी आणि सरळ व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य!

श्रीगणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो दु:खहर्ता आहे, सुखकर्ता आहे अशी उपासकांची श्रद्धा असते. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करून, अथर्वशीर्षाचे पाठ म्हणून, दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन यथाशक्ती गरीब-गरजूंना दान करून उपासाची पारणा केल्याने याच जन्मी समाधानाचे पुण्य प्राप्त करून घेता येते. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. जीवन आनंदी, सुखी व समाधानी होण्यास मदत होते.-

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८