शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

सोलापुरात दिवसाला केवळ २८०० नागरिकांच्या हातात शिवभोजनाची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:48 PM

हजारो नागरिकांवर उपाशीची पाळी, केंद्र आणि थाळींची संख्या वाढली पाहिजे

सोलापूर : तमिळनाडूमध्ये अम्मा कॅन्टीन लोकप्रिय आहे. भरपेट आणि स्वादिष्ट भोजन कॅन्टीनमधून मिळते, तेही अत्यल्प दरात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शिवभोजन थाळी ही योजना अमलात आणली. लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळी अगदी मोफत करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात रोज २,८०० नागरिकांच्या हातात शिवभोजनाची थाळी मिळते. प्रत्यक्षात याहून दहा पटीने अधिक शिवभोजन थाळीला मागणी आहे.

लॉकडॉऊनमुळे अनेकांची रोजीरोटी बुडाली. रोजगार बुडाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांची ‘रोटी’ ची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे त्यांच्या भाषणात सांगितले. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. श्रमिक कामगारांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या जिल्ह्यात फक्त रोज तीन २,८०० लोकांनाच मोफत जेवण मिळते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे श्रमिक कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणताहेत. .............

जिल्ह्यात शिवभोजन केंद्र 

३३ 

 

दररोज लाभ - २,८०० थाळी

स्वादिष्ट मेनू

सोलापूर शहर परिसरात एकूण पाच ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू आहे. या पाच केंद्रांवर फक्त ८२५ थाळी वितरित होतात. त्यासोबत ग्रामीण भागात २८ ठिकाणी शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या २८ ठिकाणी दररोज १,८०० ते २ हजार थाळी वितरित होतात. भाजी, दोन पोळी. वाटीभर भात, आमटी असा मेनू मिळतो. पूर्वी प्रति थाळी पाच रुपये आकारले जायचे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार थाळी मोफत दिली जात आहे.

या लॉकडाऊन काळात कारखाने बंद आहेत. त्यामुळे खाण्याचे वांदे होत आहेत. अशा काळात शिवभोजन थाळी केंद्राचा आधार वाटतो. एखाद्या दिवशी उशीर झाल्यास केंद्र बंद होऊन जाते. त्या दिवशी उपाशी राहावे लागते.

तुळशीदास माने

अवघ्या तासाभरात शिवभोजन केंद्र बंद पडते. त्यानंतर आलेल्या नागरिकांची पंचाईत होते. भोजन मिळत नाही. थाळींची संख्या वाढवा.

- असलम पठाण

सोलापूर जिल्हा खूप मोठा आहे. प्रत्येक गावात शिवभोजन केंद्र असावे. केंद्रांची संख्या वाढली पाहिजे. अन्यथा उपाशी राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल.

- जावेद अली

 

टॅग्स :Solapurसोलापूरshiv bhojnalayaशिवभोजनालयcorona virusकोरोना वायरस बातम्या