शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ६५८ गावे, ११९३ वाड्यांमध्ये भासणार पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:01 IST

शासनाला अहवाल सादर: पाणीटंचाई निवारण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला ३७ कोटींची गरज

ठळक मुद्देपाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेलआपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून २०१९ पर्यंतचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असून, उपाययोजनेसाठी शासनाकडे ३७ कोटी ९ लाखांची मागणी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी दिली. 

यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आल्यावर त्यांनी टंचाई स्थितीचे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात कोणकोणत्या गावात पाणीटंचाई जाणवेल याचे सर्वेक्षण करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ४०७ गावे व ५४५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळाच्या उपाययोजनेसाठी १० कोटींची गरज भासणार आहे. 

जानेवारी ते मार्च २०१९ या काळात ५५० गावे व १००६ वाड्यांवर पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळातील पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी १२ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत, तर एप्रिल ते जून २०१९ या काळात ६४० गावे व ११८३ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार हे गृहीत धरून या काळासाठी १४ कोटी ७१ लाख खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे जून २०१९ पर्यंतच्या पाणीपुरवठा टंचाईचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर नियोजन करावे लागणार आहे. 

दुष्काळाची दाहकता वाढली तरी आपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोठेही टँकर सुरू नसला तरी अनेक गावांनी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरचे नियोजन करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी आल्यावर स्थानिक आमदार फंडातून चार विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. 

असा आहे पाणीटंचाई आराखडा- आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ या काळातील पाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या काळात ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. यामध्ये अक्कलकोट, गावे: ११७, वाड्या: १९, बार्शी: ५६, करमाळा: ८९, माढा: ६६, वाड्या: १, मंगळवेढा: ७३, वाड्या: ५४८, माळशिरस: २२, वाड्या: १६०, मोहोळ: ३८, उत्तर सोलापूर: ३६, वाड्या: ५, पंढरपूर: ३८, वाड्या: १४२, दक्षिण सोलापूर: ७०, वाड्या: २, सांगोला: ५३, वाड्या: ३१६.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती