शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील ६५८ गावे, ११९३ वाड्यांमध्ये भासणार पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:01 IST

शासनाला अहवाल सादर: पाणीटंचाई निवारण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला ३७ कोटींची गरज

ठळक मुद्देपाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेलआपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून २०१९ पर्यंतचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असून, उपाययोजनेसाठी शासनाकडे ३७ कोटी ९ लाखांची मागणी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी दिली. 

यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आल्यावर त्यांनी टंचाई स्थितीचे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात कोणकोणत्या गावात पाणीटंचाई जाणवेल याचे सर्वेक्षण करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ४०७ गावे व ५४५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळाच्या उपाययोजनेसाठी १० कोटींची गरज भासणार आहे. 

जानेवारी ते मार्च २०१९ या काळात ५५० गावे व १००६ वाड्यांवर पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळातील पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी १२ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत, तर एप्रिल ते जून २०१९ या काळात ६४० गावे व ११८३ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार हे गृहीत धरून या काळासाठी १४ कोटी ७१ लाख खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे जून २०१९ पर्यंतच्या पाणीपुरवठा टंचाईचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर नियोजन करावे लागणार आहे. 

दुष्काळाची दाहकता वाढली तरी आपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोठेही टँकर सुरू नसला तरी अनेक गावांनी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरचे नियोजन करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी आल्यावर स्थानिक आमदार फंडातून चार विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. 

असा आहे पाणीटंचाई आराखडा- आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ या काळातील पाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या काळात ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. यामध्ये अक्कलकोट, गावे: ११७, वाड्या: १९, बार्शी: ५६, करमाळा: ८९, माढा: ६६, वाड्या: १, मंगळवेढा: ७३, वाड्या: ५४८, माळशिरस: २२, वाड्या: १६०, मोहोळ: ३८, उत्तर सोलापूर: ३६, वाड्या: ५, पंढरपूर: ३८, वाड्या: १४२, दक्षिण सोलापूर: ७०, वाड्या: २, सांगोला: ५३, वाड्या: ३१६.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती