शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ६५८ गावे, ११९३ वाड्यांमध्ये भासणार पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:01 IST

शासनाला अहवाल सादर: पाणीटंचाई निवारण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला ३७ कोटींची गरज

ठळक मुद्देपाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेलआपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून २०१९ पर्यंतचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असून, उपाययोजनेसाठी शासनाकडे ३७ कोटी ९ लाखांची मागणी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी दिली. 

यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आल्यावर त्यांनी टंचाई स्थितीचे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यात कोणकोणत्या गावात पाणीटंचाई जाणवेल याचे सर्वेक्षण करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ४०७ गावे व ५४५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळाच्या उपाययोजनेसाठी १० कोटींची गरज भासणार आहे. 

जानेवारी ते मार्च २०१९ या काळात ५५० गावे व १००६ वाड्यांवर पाणीटंचाई जाणवणार आहे. या काळातील पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी १२ कोटी ३७ लाख रुपये लागणार आहेत, तर एप्रिल ते जून २०१९ या काळात ६४० गावे व ११८३ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार हे गृहीत धरून या काळासाठी १४ कोटी ७१ लाख खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे जून २०१९ पर्यंतच्या पाणीपुरवठा टंचाईचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे. यामुळे अनेक गावे व वाड्यावस्त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर नियोजन करावे लागणार आहे. 

दुष्काळाची दाहकता वाढली तरी आपत्कालीन स्थितीत तोंड देण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोठेही टँकर सुरू नसला तरी अनेक गावांनी मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरचे नियोजन करण्यात येणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी आल्यावर स्थानिक आमदार फंडातून चार विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. 

असा आहे पाणीटंचाई आराखडा- आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ या काळातील पाणीटंचाई नियोजनासाठी ३७ कोटी ९ लाख खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या काळात ६५८ गावे व ११९३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. यामध्ये अक्कलकोट, गावे: ११७, वाड्या: १९, बार्शी: ५६, करमाळा: ८९, माढा: ६६, वाड्या: १, मंगळवेढा: ७३, वाड्या: ५४८, माळशिरस: २२, वाड्या: १६०, मोहोळ: ३८, उत्तर सोलापूर: ३६, वाड्या: ५, पंढरपूर: ३८, वाड्या: १४२, दक्षिण सोलापूर: ७०, वाड्या: २, सांगोला: ५३, वाड्या: ३१६.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीdroughtदुष्काळSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेती