शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोलापूर जिल्ह्यात २० हजार लिटरने दूध संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 15:29 IST

दुष्काळाची दाहकता;  पुढील दोन महिन्यांचा शेतकºयांसाठी कठीण काळ

ठळक मुद्देजानेवारीपासून जून-जुलैपर्यंतचा कालावधी हा दूध संकलनात घट होण्याचा कालावधी समजला जातो.सोलापूर जिल्ह्यात मागील चार-पाच वर्षांपासून दूध संकलन सरासरी १२ लाख लिटर सातत्याने टिकून आहेयावर्षी पाऊस कमी पडल्याचा परिणाम जनावरांची संख्या घटण्यावर व दूध संकलन कमी होण्यावर झाला

सोलापूर:  दुष्काळाचे परिणाम हळूहळू दिसू लागले असून, जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात दूध संकलनात प्रतिदिन २० हजार लिटरने घट झाली आहे. पुढील दोन महिन्यांचा शेतकºयांसाठी कठीण काळ असल्याचे सांगण्यात येते.

जानेवारीपासून जून-जुलैपर्यंतचा कालावधी हा दूध संकलनात घट होण्याचा कालावधी समजला जातो. सोलापूर जिल्ह्यात मागील चार-पाच वर्षांपासून दूध संकलन सरासरी १२ लाख लिटर सातत्याने टिकून आहे; मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याचा परिणाम जनावरांची संख्या घटण्यावर व दूध संकलन कमी होण्यावर झाला आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्यात सोलापूर जिल्ह्याचे एकूण दूध संकलन प्रतिदिन १२ लाख ९१ हजार ८३ लिटर  झाल्याची आकडेवारी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाची आहे. यावर्षी मार्च २०१९ या महिन्यात प्रतिदिन १२ लाख ७१ हजार २८० लिटर दूध संकलन झाले असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षांतील मार्च महिन्यात संकलन झालेल्यामध्ये प्रतिदिन २० हजार लिटरची घट झाल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. 

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी यावर्षी ऊस गाळप केले. यावर्षी अन्य चारा नसल्याने साखर कारखाने सुरू होते तोपर्यंत उसाच्या  वाड्याचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर झाला. कारखाने बंद झाल्यानंतर वाळलेल्या वाड्याचा चारा, शिल्लक असलेले काहीअंशी गवत व कडब्यावर जनावरे जतन केली आहेत. जनावरांची भूक भागण्याइतका चारा मिळत नसल्याने जनावरांच्या दूध संकलनावर परिणाम झाला आहे. याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. 

आता पाण्याचीही टंचाई

  • - सध्या चाºयासोबत पाण्याचीही टंचाई भासू लागली आहे.  गावोगावी टँकरद्वारे नागरिकांना पाणी दिले जात असून एका व्यक्तीसाठी प्रतिदिन २० लिटर पाणी मंजूर केले जात आहे. यात जनावरांच्या पाण्याचा कसलाही विचार केला जात नाही. गावोगावी असलेल्या जनावरांना पुरेसे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.
  • - सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ व शिवामृत सहकारी दूध संघ अकलूज यांचे दूध संकलन मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. जिल्हा संघाचे ६ हजार व शिवामृतचे २२ हजार लिटर दूध वाढले आहे; मात्र खासगी संघाच्या संकलनात जवळपास ३९ हजार लिटरची घट झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आमच्या दूध संकलनात २२ हजार लिटर दूध संकलन वाढले होते. वर्षभर दूध संकलन वाढत गेले मात्र मार्च-एप्रिल महिन्यात १५ हजार लिटर संकलन कमी झाले आहे. मार्च १८ च्या तुलनेत मार्च १९ मध्ये ५-६ हजार लिटर दूध संकलन वाढले आहे.- सतीश मुळेव्यवस्थापकीय संचालक दूध संघ 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाdroughtदुष्काळWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती