शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळाले ३२१ कोटी, ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:53 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

ठळक मुद्दे पाचव्या यादीतील दोन हजार ५२७ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी ५२ लाख ५३ हजार ४५० रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू बँकेला आतापर्यंत शेतकºयांच्या सहा याद्या आल्या असून यापैकी ५४ हजार ६६३ शेतकºयांच्या खात्यावर २७५ कोटी ७३ लाख ५४ हजार ८५५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली‘मिसमॅच’मधील ३३ हजार २२६ पात्र शेतकºयांचीही यादी शासनाला पाठविण्यात आली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्हा बँकेला नव्याने १९ हजार ७१४ शेतकºयांची ग्रीन यादी आली असून, सोबत दोन टप्प्यात ४६ कोटी १७ लाख २१ हजार ७०९ रुपयेही आले आहेत. जिल्हा बँकेला आतापर्यंत ३२१ कोटी ८३ लाख २६ हजार २०४ रुपये कर्जमाफीसाठी मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठीच्या आॅनलाईन अर्ज केलेल्या उर्वरित खातेदारांची पात्र व अपात्र यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘यलो’ यादीतील पात्र २३३४ शेतकºयांची यादी यापूर्वीच शासनाकडे गेली असून ‘मिसमॅच’मधील ३३ हजार २२६ पात्र शेतकºयांचीही यादी शासनाला पाठविण्यात आली आहे. या यादीची शासन स्तरावर तपासणी करून पैसे देण्यात येत आहेत. शासनाकडून आलेल्या व बँकेकडून तपासणी करून शासनाकडे पुन्हा गेलेल्या यादीमधील १९ हजार ७१४ शेतकºयांची नव्याने यादी जिल्हा बँकेकडे आली आहे. ही यादी बँक तपासणी करणार आहे. बँकेला आतापर्यंत शेतकºयांच्या सहा याद्या आल्या असून यापैकी ५४ हजार ६६३ शेतकºयांच्या खात्यावर २७५ कोटी ७३ लाख ५४ हजार ८५५ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.  यापूर्वी आलेल्या पाचव्या यादीतील दोन हजार ५२७ पात्र शेतकºयांच्या खात्यावर १४ कोटी ५२ लाख ५३ हजार ४५० रुपये जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. नव्याने बुधवारी आलेले ३१ कोटी ६४ लाख ६८ हजार २५९ रुपये शासन सूचनेनुसार जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले. ------------------------८८ हजार शेतकरी पात्र - जिल्हा बँकेला आतापर्यंत वेगवेगळ्या याद्या आल्या आहेत. यामध्ये ‘ग्रीन’ याद्या चार वेळा तर ‘यलो’ व मिसमॅच याद्या प्रत्येकी एक वेळा आली आहे. या याद्यांची तपासणी करून एक लाख १८ हजार ५६१ खातेदारांची ग्रीन यादी बँकेला आली होती. यापैकी ८७ हजार ७८० खातेदारांची यादी अचूक आहे. बँकेच्या एक लाख ६८ हजार ५६५ शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते. -जिल्ह्यातील दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदार ३९ हजार २३५ शेतकºयांच्या खात्यावर २४७ कोटी २६ लाख ३४ हजार ५०२ रुपये जमा झाले असून, नियमित कर्ज भरणाºया १५ हजार ४२८ शेतकºयांच्या खात्यावर २८ कोटी २९ लाख १४ हजार १४२ रुपये जमा झाले आहेत. दीड लाखावरील थकबाकीदार पात्र शेतकºयांची संख्या १६ हजार २२० इतकी असून, यापैकी ९०० शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली असल्याने त्यांच्या खात्यावर दीड लाखाप्रमाणे रक्कम जमा करण्यासाठी चार कोटींचा निधी आला आहे. ---------------------शासनाने उर्वरित खातेदारांची यादी व पैसे लवकर द्यावेत. दीड लाखावरील खातेदारांंनी रक्कम भरल्यानंतर किमान आठ दिवसात त्यांच्या खात्यावर दीड लाखाची रक्कम जमा करण्यासाठी आमच्या बँकेला आगाऊ रक्कम द्यावी. आमच्याकडे आलेल्या पात्र खातेदारांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा करीत आहोत.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी