शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे.त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर दि १७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेला एकूण ९५ हजार १७९ शेतकºयांची यादी आली असून त्यांच्यासाठी ३५९ कोटी ३४ हजार १२७ रुपयांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात बँकेला २७५ कोटी ६६ लाख चार हजार ५०१ रुपये देण्यात आले होते. आलेल्या यादीची तपासणी केली असता ६६ हजार ८०९ शेतकºयांची कर्जखात्याची माहिती बरोबर आढळली. तपासणीत २८ हजार ३७० शेतकºयांच्या खात्याबाबत चुका निघाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करून बरोबर असलेली शेतकºयांची याद शासनाकडे पाठवली आहे. या यादीबाबत शासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. बँकेने आतापर्यंत ५१ हजार १८१ शेतकºयांच्या खात्यावर २६५ कोटी ७ लाख ८१ हजार २९० रुपये जमा केले आहेत. दीड लाखावरील कर्जदारांची संख्या २५ हजार ४६१ इतकी असून या शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली तरच त्यांना दीड लाखाची रक्कम मिळणार आहे.नव्याने १० हजार १४० शेतकºयांची त्रुटी असलेली यादी तर ४७ हजार ११ शेतकºयांच्या यादीत मेळ (मिसमॅच) नसलेली यादी जिल्हा बँकेला मिळाली आहे. ही यादी अंतिम असून तिला शासनाने ‘यलो’(पिवळी) संभोधले आहे. यादीतील शेतकºयांच्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून परत शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. ----------------------------आठ कोटी दिले परत- जिल्हा बँक व आॅनलाईन भरलेल्या फॉर्ममधील माहितीत मेळ नसलेल्या (मिसमॅच)च्या ४७ हजार ११ शेतकºयांच्या याद्या बँकेच्या शाखेत लावण्यात येतील.- त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे.- तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार आहे.- कर्जमाफीसाठी दिलेल्यांपैकी ८ कोटी रुपये शासनाला परत दिले असून बँकेकडे दोन कोटी ५८ लाख २३ हजार २११ रुपये शिल्लक आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी