शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे.त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर दि १७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या त्रुटी व यादीत मेळ (मिसमॅच) नसलेल्या ५७ हजार १५१ शेतकºयांची यादी जिल्हा बँकेला आली आहे. ही ४७ हजार ११ शेतकºयांची ‘यलो’ यादी शेवटची राहणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरलेल्या शेतकºयांची संख्या एकूण एक लाख ५२ हजार ३३० इतकी झाली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेला एकूण ९५ हजार १७९ शेतकºयांची यादी आली असून त्यांच्यासाठी ३५९ कोटी ३४ हजार १२७ रुपयांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात बँकेला २७५ कोटी ६६ लाख चार हजार ५०१ रुपये देण्यात आले होते. आलेल्या यादीची तपासणी केली असता ६६ हजार ८०९ शेतकºयांची कर्जखात्याची माहिती बरोबर आढळली. तपासणीत २८ हजार ३७० शेतकºयांच्या खात्याबाबत चुका निघाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करून बरोबर असलेली शेतकºयांची याद शासनाकडे पाठवली आहे. या यादीबाबत शासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. बँकेने आतापर्यंत ५१ हजार १८१ शेतकºयांच्या खात्यावर २६५ कोटी ७ लाख ८१ हजार २९० रुपये जमा केले आहेत. दीड लाखावरील कर्जदारांची संख्या २५ हजार ४६१ इतकी असून या शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केली तरच त्यांना दीड लाखाची रक्कम मिळणार आहे.नव्याने १० हजार १४० शेतकºयांची त्रुटी असलेली यादी तर ४७ हजार ११ शेतकºयांच्या यादीत मेळ (मिसमॅच) नसलेली यादी जिल्हा बँकेला मिळाली आहे. ही यादी अंतिम असून तिला शासनाने ‘यलो’(पिवळी) संभोधले आहे. यादीतील शेतकºयांच्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून परत शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. ----------------------------आठ कोटी दिले परत- जिल्हा बँक व आॅनलाईन भरलेल्या फॉर्ममधील माहितीत मेळ नसलेल्या (मिसमॅच)च्या ४७ हजार ११ शेतकºयांच्या याद्या बँकेच्या शाखेत लावण्यात येतील.- त्रुटीचा पुरावा शेतकरी व बँकेने जोडून प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे.- तालुकास्तरीय समिती कागदपत्रांच्या पुराव्यावरून कर्जमाफीस पात्र-अपात्रतेची शिफारस बँकेला करणार आहे.- कर्जमाफीसाठी दिलेल्यांपैकी ८ कोटी रुपये शासनाला परत दिले असून बँकेकडे दोन कोटी ५८ लाख २३ हजार २११ रुपये शिल्लक आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी