शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

सोलापुरात दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 04:03 IST

१० टक्के पाण्याची चोरी; तीन मुख्य स्रोतांतून पाणीपुरवठा, दर वाढविण्याआधी गळती, चोरी थांबविण्याची मागणी

- शीतलकुमार कांबळेसोलापूर : शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल सहा कोटी लिटर पाणी दररोज वाया जाते. पाण्याचे दर वाढविण्यापेक्षा वाया जाणारे पाणी आधी थांबवायला हवे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.शहराची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख इतकी आहे. दिवसाला प्रति माणशी१०० ते १०५ लिटर इतके पाणी महापालिकेतर्फे शहराला पुरविण्यात येते. विविध स्रोतांच्या माध्यमातून महापालिका १६० एमएलडी पाण्याचा उपसा करते, तर सुमारे १०० एमएलडी पाणी प्रत्यक्ष सोलापूरकरांना मिळते. गळती, औद्योगिक वापर, प्युरिफिकेशन लॉस, पाणी शहराकडे आणताना होणारा काही प्रमाणातील अपव्यय मिळून सुमारे ६० एमएलडी, म्हणजेच सहा कोटी लिटर पाणी वाया जाते.उजनी धरण ते सोलापूर शहर अशी थेट पाईपलाईन (११० किलोमीटर) ४० टक्के , टाकळी येथील बंधारा ५० टक्के व हिप्परगा तलाव येथून १० टक्के इतके पाणी शहरासाठी वापरले जाते. महापालिकेला प्रत्येक १ हजार लिटरसाठी सरासरी १३ रुपये इतका खर्च येतो. पाण्याची गळती ३० टक्के इतकी असून, सुमारे १० टक्के पाण्याची चोरी होते. नागरिकांसाठी आकारण्यात येणारा पाण्याचा दर हा १००० लिटरमागे ११.२५ रुपये इतका आहे. सध्या सरासरी पाण्याची थकबाकी ही ३.५ कोटी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यांतील ३३ गावांचे ६३१ गट निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाºया उजनी ते सोलापूर समांतर दुहेरी जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष पाईप टाकण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.11,50,000 सोलापूरची लोकसंख्या100-105 लिटर पाणी पालिका प्रति माणशीदिवसाला पुरवते30% पाण्याची गळती10% पाण्याची चोरी"11.25-11.70 घरगुती दर (प्रति एक हजार लिटर)"35.10-37.80 व्यावसायिक दर (प्रतिएक हजार लिटर)"11,556 अर्धा इंची पाईप असेल, तर वार्षिक दर"23,108 पाऊणइंची पाईप असेल तर वार्षिक दर3.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले.160 एमएलडी पाण्याचा उपसा विविध स्रोतांच्या माध्यमातून रोज पालिका करतेशहरात पाणी आणण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जुने झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी गळती होते. या पाईपलाईन दुरुस्तीचा प्रस्ताव जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.- संजय धनशेट्टी,सार्वजनिक आरोग्य अभियंताशहरात नवी पाईपलाईन गरजेची आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही जुने झाले आहे. नव्या तंत्राने पाणी शुद्ध केल्यास या प्रक्रियेतून जे पाणी वाया जात होते, त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.- विलास लोकरे, अध्यक्ष,सीना-भीमा नदी संघर्ष समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई