शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सोलापुरात दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 04:03 IST

१० टक्के पाण्याची चोरी; तीन मुख्य स्रोतांतून पाणीपुरवठा, दर वाढविण्याआधी गळती, चोरी थांबविण्याची मागणी

- शीतलकुमार कांबळेसोलापूर : शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल सहा कोटी लिटर पाणी दररोज वाया जाते. पाण्याचे दर वाढविण्यापेक्षा वाया जाणारे पाणी आधी थांबवायला हवे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.शहराची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख इतकी आहे. दिवसाला प्रति माणशी१०० ते १०५ लिटर इतके पाणी महापालिकेतर्फे शहराला पुरविण्यात येते. विविध स्रोतांच्या माध्यमातून महापालिका १६० एमएलडी पाण्याचा उपसा करते, तर सुमारे १०० एमएलडी पाणी प्रत्यक्ष सोलापूरकरांना मिळते. गळती, औद्योगिक वापर, प्युरिफिकेशन लॉस, पाणी शहराकडे आणताना होणारा काही प्रमाणातील अपव्यय मिळून सुमारे ६० एमएलडी, म्हणजेच सहा कोटी लिटर पाणी वाया जाते.उजनी धरण ते सोलापूर शहर अशी थेट पाईपलाईन (११० किलोमीटर) ४० टक्के , टाकळी येथील बंधारा ५० टक्के व हिप्परगा तलाव येथून १० टक्के इतके पाणी शहरासाठी वापरले जाते. महापालिकेला प्रत्येक १ हजार लिटरसाठी सरासरी १३ रुपये इतका खर्च येतो. पाण्याची गळती ३० टक्के इतकी असून, सुमारे १० टक्के पाण्याची चोरी होते. नागरिकांसाठी आकारण्यात येणारा पाण्याचा दर हा १००० लिटरमागे ११.२५ रुपये इतका आहे. सध्या सरासरी पाण्याची थकबाकी ही ३.५ कोटी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यांतील ३३ गावांचे ६३१ गट निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाºया उजनी ते सोलापूर समांतर दुहेरी जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष पाईप टाकण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.11,50,000 सोलापूरची लोकसंख्या100-105 लिटर पाणी पालिका प्रति माणशीदिवसाला पुरवते30% पाण्याची गळती10% पाण्याची चोरी"11.25-11.70 घरगुती दर (प्रति एक हजार लिटर)"35.10-37.80 व्यावसायिक दर (प्रतिएक हजार लिटर)"11,556 अर्धा इंची पाईप असेल, तर वार्षिक दर"23,108 पाऊणइंची पाईप असेल तर वार्षिक दर3.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले.160 एमएलडी पाण्याचा उपसा विविध स्रोतांच्या माध्यमातून रोज पालिका करतेशहरात पाणी आणण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जुने झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी गळती होते. या पाईपलाईन दुरुस्तीचा प्रस्ताव जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.- संजय धनशेट्टी,सार्वजनिक आरोग्य अभियंताशहरात नवी पाईपलाईन गरजेची आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही जुने झाले आहे. नव्या तंत्राने पाणी शुद्ध केल्यास या प्रक्रियेतून जे पाणी वाया जात होते, त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.- विलास लोकरे, अध्यक्ष,सीना-भीमा नदी संघर्ष समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई