शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांकडून शिकण्यासारखं खूप काही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:20 IST

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. ...

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. तीन महिने त्यांच्यासोबत राहिलो. खूप गप्पा झाल्या. त्यांचा जीवनसंघर्ष समजून घेतला. देशभरातील विविध प्रांतातील बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि विविध रूढी, परंपरा, चालीरीती असणाºया आपल्या मुलामुलींचे सहजीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.

या मुलामुलींना आपणच बोट धरून जगणं शिकवलं. शिक्षण दिले. संस्कार दिले. आत्मविश्वास दिला. आज ही मुलं जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी स्वबळावर संघर्ष करू शकतात. आज आपले नेमके उलट झाले आहे. आॅस्ट्रेलियातील नियम, शिस्त आणि सार्वजनिक गोष्टींची माहिती आणि सवय नसल्यामुळे आम्हीच त्यांचे बोट धरून चालतोय. त्यांनी दाखविलेले आधुनिक जग पाहून डोळे दिपून गेले. त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर ही मुलं केव्हाच आपलं बोट सोडून स्वतंत्र झाल्याची जाणीव झाली. आम्हालाच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकाव्या लागतात.

जग झपाट्याने बदलतंय. त्यामुळे जागतिक स्पर्धेत उतरल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे चांगल्या नोकºया कमी, याउलट जगभरात शिक्षण, कौशल्ये, क्षमता असणाºयांना बोलावून संधी मिळते. यामुळेच आपली मुलं देश सोडून आॅस्ट्रेलियात आणि जगभर स्थिरावली. तरीही त्यांच्यामध्ये ‘आमची माती आमची माणसं’ ही भावना अजूनही दिसते. त्यांनी देश सोडल्यामुळे होणाºया टीकेविषयी त्यांचे म्हणणे असे की, आपले सामर्थ्य जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडलेला सकारात्मक मार्ग आहे.

जागतिकीकरण आणि ‘ग्लोबल व्हिलेज’च्या वातावरणामुळे देशाबाहेरची नोकरी आणि जगण्यासाठी करावा लागणारा आमचा ‘स्ट्रगल’ न पाहता, आमची बाजू न ऐकता एकतर्फी केली जाणारी टीका अयोग्य आहे, अशी त्यांची तक्रार दिसते. नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा देशप्रेम जोपासत त्यांनी स्वत:ला घडविले. सक्षम बनविले. खूप कठीण परिस्थितीला सामोरे जात बदल स्वीकारले, यासाठी त्यांचे कौतुक झाले पाहिजे. वर्तमानात जगणारी, प्रचंड आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द असणारी आपली ही तरुणाई जगभरात यशस्वी होताना दिसते. 

उलट ही मुलं घरातल्या, बाहेरच्या, सगळ्यांच्या टीकेचे धनी झाले. भारतात होतो तेव्हा आमच्या नोकरीविषयी कुणीच बोलत नव्हते. त्यामुळे जागतिक स्पर्धा आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता देश सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही आनंदाने घरदार, देश सोडून आलो नाही. आईवडिलांनी शिकवून मोठे केले, तरीही बेकार फिरल्यामुळे त्यांच्या चेहºयावरची काळजी दूर करण्यासाठी आम्हाला ही किंमत मोजावी लागली. इतक्या कठोर शब्दात व्यथा मांडणाºया आपल्या मुलांमध्ये दिसलेले सर्वांगीण बदल आमच्यासाठी खूपच नवीन होते. वस्तुस्थिती आणि परिस्थितीचे अचूक आकलन, समाजभान, जबाबदार वृत्ती, कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर अशा आपल्या मुलांमधील गुणांचे इकडे भरपूर कौतुक होताना पाहिले.

मनापासून समाधान वाटले. त्यांचे राहणीमान उंचावले. जीवनशैली बदलली तरीही आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींचे जतन करीत उत्तम समतोल राखतात. आपल्या मुलामुलींनी स्वत:ला सिद्ध केल्यामुळे भारतीयांची प्रतिमा उंचावली आहे. सतत कार्यमग्न राहणाºया या मुलांची तडजोडीची, स्पर्धेची, नवख्या माणसाशी देखील जुळवून घेण्याची तयारी पाहून थक्क झालो. ‘गॉसिपिंग’मध्ये वेळ घालविण्यापेक्षा ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘उत्पादक’ गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो. स्पर्धेत झोकून देऊन जिंकण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची वाटली. इथल्या काहीच न करता वांझोटी टीका करीत रडत बसणाºयांविषयी त्यांना बिलकूल आस्था वाटत नाही. म्हणून स्वकर्तृत्वावर पुढे जाण्याची जिद्द हेच बलस्थान असलेल्या आपल्या मुलांकडून जे शिकण्यासारखे आहे ते शिकायला काय हरकत आहे.- प्रा. विलास बेत (मेलबॉर्न आॅस्ट्रेलिया) (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा