शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मुलांकडून शिकण्यासारखं खूप काही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:20 IST

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. ...

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. तीन महिने त्यांच्यासोबत राहिलो. खूप गप्पा झाल्या. त्यांचा जीवनसंघर्ष समजून घेतला. देशभरातील विविध प्रांतातील बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि विविध रूढी, परंपरा, चालीरीती असणाºया आपल्या मुलामुलींचे सहजीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.

या मुलामुलींना आपणच बोट धरून जगणं शिकवलं. शिक्षण दिले. संस्कार दिले. आत्मविश्वास दिला. आज ही मुलं जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी स्वबळावर संघर्ष करू शकतात. आज आपले नेमके उलट झाले आहे. आॅस्ट्रेलियातील नियम, शिस्त आणि सार्वजनिक गोष्टींची माहिती आणि सवय नसल्यामुळे आम्हीच त्यांचे बोट धरून चालतोय. त्यांनी दाखविलेले आधुनिक जग पाहून डोळे दिपून गेले. त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर ही मुलं केव्हाच आपलं बोट सोडून स्वतंत्र झाल्याची जाणीव झाली. आम्हालाच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकाव्या लागतात.

जग झपाट्याने बदलतंय. त्यामुळे जागतिक स्पर्धेत उतरल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे चांगल्या नोकºया कमी, याउलट जगभरात शिक्षण, कौशल्ये, क्षमता असणाºयांना बोलावून संधी मिळते. यामुळेच आपली मुलं देश सोडून आॅस्ट्रेलियात आणि जगभर स्थिरावली. तरीही त्यांच्यामध्ये ‘आमची माती आमची माणसं’ ही भावना अजूनही दिसते. त्यांनी देश सोडल्यामुळे होणाºया टीकेविषयी त्यांचे म्हणणे असे की, आपले सामर्थ्य जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडलेला सकारात्मक मार्ग आहे.

जागतिकीकरण आणि ‘ग्लोबल व्हिलेज’च्या वातावरणामुळे देशाबाहेरची नोकरी आणि जगण्यासाठी करावा लागणारा आमचा ‘स्ट्रगल’ न पाहता, आमची बाजू न ऐकता एकतर्फी केली जाणारी टीका अयोग्य आहे, अशी त्यांची तक्रार दिसते. नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा देशप्रेम जोपासत त्यांनी स्वत:ला घडविले. सक्षम बनविले. खूप कठीण परिस्थितीला सामोरे जात बदल स्वीकारले, यासाठी त्यांचे कौतुक झाले पाहिजे. वर्तमानात जगणारी, प्रचंड आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द असणारी आपली ही तरुणाई जगभरात यशस्वी होताना दिसते. 

उलट ही मुलं घरातल्या, बाहेरच्या, सगळ्यांच्या टीकेचे धनी झाले. भारतात होतो तेव्हा आमच्या नोकरीविषयी कुणीच बोलत नव्हते. त्यामुळे जागतिक स्पर्धा आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता देश सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही आनंदाने घरदार, देश सोडून आलो नाही. आईवडिलांनी शिकवून मोठे केले, तरीही बेकार फिरल्यामुळे त्यांच्या चेहºयावरची काळजी दूर करण्यासाठी आम्हाला ही किंमत मोजावी लागली. इतक्या कठोर शब्दात व्यथा मांडणाºया आपल्या मुलांमध्ये दिसलेले सर्वांगीण बदल आमच्यासाठी खूपच नवीन होते. वस्तुस्थिती आणि परिस्थितीचे अचूक आकलन, समाजभान, जबाबदार वृत्ती, कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर अशा आपल्या मुलांमधील गुणांचे इकडे भरपूर कौतुक होताना पाहिले.

मनापासून समाधान वाटले. त्यांचे राहणीमान उंचावले. जीवनशैली बदलली तरीही आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींचे जतन करीत उत्तम समतोल राखतात. आपल्या मुलामुलींनी स्वत:ला सिद्ध केल्यामुळे भारतीयांची प्रतिमा उंचावली आहे. सतत कार्यमग्न राहणाºया या मुलांची तडजोडीची, स्पर्धेची, नवख्या माणसाशी देखील जुळवून घेण्याची तयारी पाहून थक्क झालो. ‘गॉसिपिंग’मध्ये वेळ घालविण्यापेक्षा ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘उत्पादक’ गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो. स्पर्धेत झोकून देऊन जिंकण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची वाटली. इथल्या काहीच न करता वांझोटी टीका करीत रडत बसणाºयांविषयी त्यांना बिलकूल आस्था वाटत नाही. म्हणून स्वकर्तृत्वावर पुढे जाण्याची जिद्द हेच बलस्थान असलेल्या आपल्या मुलांकडून जे शिकण्यासारखे आहे ते शिकायला काय हरकत आहे.- प्रा. विलास बेत (मेलबॉर्न आॅस्ट्रेलिया) (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा