शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

टीका करताना भान ठेवून बोलायला हवं ; शिवराज पाटील-चाकुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:26 AM

आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला - सुशीलकुमार शिंदे

ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभदक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आलादेशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे - चाकूरकर

सोलापूर : डॉक्टर इमारत बांधू शकत नाही, गायक रोगी बरा करू शकत नाही, तसे राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नसणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा काय उपयोग? असा सवाल करीत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. टीका करताना भान ठेवून बोलायला हवं, असा इशारा त्यांनी सत्ताधाºयांना दिला. 

काँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना चाकूरकर बोलत होते़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना चाकूरकर यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.  देशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे़  गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने नेमके काय केले? याचा शोध घ्यावा लागेल़ आरोप करणे खूप सोपे असते़ काम करणे महाकठीण, याचा प्रत्यय केंद्रातल्या सरकारला येत असावा़ आश्वासनं देणं सोपं, पण ती पाळताना किती कसरत करावी लागते याचा अनुभव आम्हाला आहे़ सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

हल्ली गांधी-नेहरु घराण्यावर सत्ताधारी पक्षाची मंडळी तोंडसुख घेत आहेत, असे सांगताना चाकूरकर म्हणाले, नेहरू यांच्याविषयी अपशब्द वापरणं हे नेहरुंवर नव्हे तर देशावर अन्याय करणारं ठरेल.  शेतकरी, शेतमजूर हा या देशाचा कणा़ तोच आता खिळखिळा बनत चालला आहे़ त्याला जबाबदार कोण? असा सवालही चाकूरकरांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ते माझे चांगले मित्र आहेत़ बाबासाहेबांनी घटना लिहिताना सर्वधर्मसमभाव हा या देशाचा पाया असल्याचे नमूद केले़ पण आमचे मित्र जातीयवादी शक्तीबरोबर गेले, याचे मला खरे दु:ख  आहे़ एमआयएमसारख्या जातीयवादी शक्तींनी हा देश खिळखिळा केला़ त्यांची सोबत करायला नको होती.

उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या कार्यक्रमावेळी आ़ सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, आ़ रामहरी रुपनवर, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, उज्ज्वलाताई शिंदे,  जि. प. माजी अध्यक्ष बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, चेतन नरोटे मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, गणेश पाटील, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, उत्तर सोलापूर तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रल्हाद काशिद यांची उपस्थिती होती़

आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला- एमआयएमसारख्या धर्मांध पक्षासोबत आघाडी करून डॉ. बाबासाहेबांच्या नातवाने राज्यघटनेचा खून केला असून, भाजपा हा नरेंद्र मोदीसारख्या हुकूमशहाचा पक्ष असल्याची टीका काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मार्डी येथे केली. - देशवासीयांनी गेल्या निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत आपल्या देशातील लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवली, हे जनतेच्याही आता व्यवस्थित लक्षात आले आहे, अशी टीकाही शिंदे यांनी भाजपवर केली.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस