शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धक्कादायक; हैदराबाद येथे कत्तलीसाठी जाणाºया चार उंटांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 11:04 IST

१० उंट घेतले ताब्यात; चालक, क्लीनरविरुद्ध गुन्हा दाखल; गोरक्षक कार्यकर्त्यांची सतर्कता

ठळक मुद्देप्रवासादरम्यान आवाज करू नये यासाठी मालट्रकमध्ये निर्दयीपणे भरण्यात आलेल्या १४ उंटांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होतेनाकामध्ये हुक्क घालण्यात आले होते. दोन्ही पायांना दोरी बांधण्यात आली होतीराजस्थानहून निघालेला मालट्रक हैदराबाद येथे पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतात

सोलापूर : राजस्थानहूनहैदराबादकडे कत्तलीसाठी जाणाºया १४ उंटांचा मालट्रक हैदराबाद रोडवरील एका हॉटेलसमोर पकडण्यात आला. चालक व क्लीनर या दोघांना पकडण्यात आले असून, मालक मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. आतील उंटांना बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यातील चार उंट मरण पावले. सध्या १0 उंट हे जिवंत आहेत.  गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली. चालक, क्लीनरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला   आहे. 

चालक आह महंमद नूरहनी रजपूत, क्लीनर परवेज नानू कुरेशी (दोघे रा. जि. बागपद राज्य- उत्तरप्रदेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत तर मालक इद्रीस कासार हा मालट्रक पकडल्यानंतर पळून गेला. अधिक माहिती अशी की, गोरक्षक शनिवारी सायंकाळी ५.३0 वाजता हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड येथे थांबले  होते. दरम्यान, एक मालट्रक (क्र.यु.पी १७ ए.टी.0४१२) हा हैदराबादच्या दिशेने जात होता. दरम्यान, आतून जनावरे हंबरण्याचा आवाज त्यांना आला. 

गोरक्षकांनी मालट्रक अडवला. आतमध्ये काय आहे अशी विचारणा चालकाकडे केली. चालकाने उंट असल्याचे सांगितले. हे उंट राजस्थान येथून आण्यात आले असून, ते कत्तलीसाठी राजस्थान येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. 

गोरक्षकांनी तत्काळ पोलिसांना बोलावून मालट्रक शेळगी येथील पोलीस चौकीजवळ नेला. मालट्रकमध्ये पाहिले असता आतमध्ये निर्दयीपणे चौदा उंट भरल्याचे दिसून आले. उंटाच्या दोन्ही पायांना बांधण्यात आले होते.

 अधिक चौकशी करीत असताना मालक इद्रीस कासार हा पळून गेला. मालट्रक मरिआई चौकातील अंतरिक्ष गोशाळेत नेण्यात आला. आतील उंटांना बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यातील चार उंट मरण पावले. सध्या १0 उंट हे जिवंत आहेत. याची पोलिसात नोंद झाली आहे. भारतीय कृषीगोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, शहराध्यक्ष विजय यादव, गोरक्षक सिद्धू भाईकट्टी, प्रशांत परदेशी, यतीराज व्हनमाने, समर्थ बंडे, किरण पंगुडवाले, संकेत आटकळे, मनीष जाधवांनी, विठ्ठल सरवदे, प्रतिक्षीत परदेशी यांनी ही कामगिरी केली. 

उंटांना दिले होते भुलीचे इंजेक्शन : सुधाकर बहिरवाडे- प्रवासादरम्यान आवाज करू नये यासाठी मालट्रकमध्ये निर्दयीपणे भरण्यात आलेल्या १४ उंटांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होते. नाकामध्ये हुक्क घालण्यात आले होते. दोन्ही पायांना दोरी बांधण्यात आली होती. राजस्थानहून निघालेला मालट्रक हैदराबाद येथे पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. इतक्या मोठ्या प्रवासात उंटांना निर्दयीपणे उभे करून बांधण्यात आले होते. त्यांना चारा, पाणी अशी कोणतीही सुविधा दिसत नव्हती. संशय आल्याने आम्ही तपासणी केली आणि दहा उंटांना वाचवू शकलो अशी माहिती भारतीय कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिसRajasthanराजस्थानhyderabad-pcहैदराबाद