शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

धक्कादायक; उपवासाच्या पदार्थामुळे वाढेल रक्तात साखर अन् पोटात पित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 11:48 IST

आहार तज्ज्ञांचा सल्ला : साबुदाणा, वेफर्सपेक्षा फळांचा आहार घेण्याचा सल्ला

सोलापूर : नवरात्र सुरू होताच सण-उत्सवांचा उत्सव सुरू होतो. तसेच व्रतवैकल्यांसह उपवास मोठ्या प्रमाणात सुरू होते. पण याकाळात उपवासाच्यावेळी चुकीचे आहार घेतल्यामुळे अनेकांना पित्तासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे उपवासाच्या काळात साबुदाणा, वेफर्सपेक्षा फळांचा आहार वाढविला पाहिजे, असे आवाहन आहार तज्ज्ञांनी केले आहे.

भारतीय संस्कृतीत उपवासाला खूप महत्त्व आहे. धार्मिक व्रतवैकल्य आणि उपवास यांची सांगड पूर्वीपासून घातली गेली आहे. उपवास म्हणजे पचनक्रियेस आराम देणं. यामुळे शरीरास अनेक फायदे आहेत. यामुळे पचन सुधारते, हलकेपणा येतो आणि पर्यायाने उत्साह येतो. साबुदाणा आणि त्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ जसे वेफर्स, वडे आदी पदार्थांमुळे उष्णता, आम्लपित्त वाढणं, पोट बिघडणं, उलट्या होणं असे त्रास होतात. यामुळे उपवास योग्य पद्धतीनं केला, तर आपल्या पचनसंस्थेलाही थोडी विश्रांती मिळते. यामुळे राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार नाही. खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा लस्सी, ताक यांसारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा

पण, मधुमेह, उच्च वा कमी रक्तदाब असेल, तर किंवा गरोदर आणि स्तनपान देणारी स्त्री, वयोवृद्धांनी शक्यतो उपवास करू नये, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केला.

थकविणारे व्यायाम टाळा

उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खातं राहणं टाळा. जर जस्त व्यायाम केल्यास अशक्तपणा किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

असा घ्यावा आहार...

उपवास करताना उपवासाच्या आदल्या दिवशी रोजचा समतोल आहार घ्या. यात राजगिरा पीठ, लाह्या, रताळं किंवा या सर्व पदार्थांची भाजणीपासून बनवलेले पदार्थ दिवसभरात थोडे थोडे खावेत. कडी, लाल भोपळा याची भाजी, कोशिंबीर किंवा रायतं करून खावं. ताजं, गोड दही, ताक, मठ्ठा घ्यावा. फळं आणि सुकामेवा यांचा वापर करावा. असे पदार्थ प्रमाणात आणि विभागून खाल्ल्यानं उपवासादिवशी ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. शिवाय उष्णता आणि पित्तही होत नाही.

 

जे काही उपवासाचे पदार्थ आहेत. त्यामुळे शुगर वाढते, आणि ॲसिडिटी वाढते, हे जास्त तिखट किंवा मसालेदार करू नये. यासोबत ज्युस, फळे वापरायला पाहिजे. मधुमेह रुग्णांना रताळे, बटाटे खाऊ नये. यामुळे त्यांचे शुगर वाढू शकते. अशा रुग्णांनी उपवास न केलेले बरे. जर केले तर दिवसातून एकदा तरी खावे.

- डॉ. प्रसाद कोरूलकर, फिजिशयन

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यNavratriनवरात्रीhospitalहॉस्पिटल