शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 14:48 IST

Sharad Pawar : अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती.

ठळक मुद्देकोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती.

सोलापूर/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे निर्माते खासदार शरद पवार हे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात येताच त्यांनी कोरोना कालवधीत घेतलेल्या बैठकीची आणि विधानसभा निवडणुकांच्या आठवणी जागवल्या. तसेच, राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता घरी बसवायचं आहे, असे म्हणत सोलापूरातून आपण संघर्षाची सुरूवात केली होती, याची आठवणही पवारांनी सांगितली.  

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज सोलापूरमध्ये येण्याचा योग आला. सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याबद्दल प्रशासन, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी यांना धन्यवाद द्यायला हवे, असे पवार यांनी म्हटले.

तसेच, आणखी एक गोष्ट सोलापूरच्या निमित्ताने आठवली. विधानसभेच्या निवडणुकीआधी सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची पळापळ सुरू होती.अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती. तो निर्णय आम्ही घेतला व त्या संघर्षाची सुरुवात याच हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहातून केली. माझे पहिले भाषण येथेच झाले होते. त्यावेळी चर्चा होती की, भाजपचेच सरकार येणार. पण, आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आत्मविश्वासाने लढल्याची आठवण पवार यांनी सोलापुरात करून दिली. 

पाहुण्यांची चिंता वाटत नाही

शरद पवारांनी सोलापुरात जबरदस्त बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण, पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीची आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला येडी ठरवलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं.

बंदमध्ये शांततेत सहभाग नोंदवा

लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजपा नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपा नेत्यांनी गाड्या घातल्या; शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSolapurसोलापूरBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या