शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

२४८ व्यसनमुक्त केंद्रे उभारून २५ हजार व्यक्तींना केले व्यसनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:07 AM

सांगोल्याच्या मुख्याध्यापकाने घेतला व्यसनमुक्तीचा ध्यास; उद्ध्वस्त संसार सुखी करण्याचा प्रयास

ठळक मुद्देव्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केलेकोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश

अरुण लिगाडे 

सांगोला : व्यसनामुळे कुटुंबात होणारे ताणतणाव व त्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार लहानपणीच पाहिल्यामुळे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त अभियानात काम केले़ त्यांच्या प्रेरणेने स्वत:च एक संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटकात २४८ व्यसनमुक्त केंद्रे सुरु करुन आजपर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना व्यसनांपासून दूर केले. अशा व्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.

मूळचे वाटंबरेचे व सोनंद येथील केंद्रीय आश्रमशाळेत मुख्याध्यापक असलेले दिगंबर भागवत साळुंखे यांनी १९९९ ते २००२ या काळात ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघात कासारशिरंबे काम केले. तेथील व्यसनमुक्तीवरील व्याख्याने ऐकल्यानंतर वाटंबरे या आपल्या गावी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही. मात्र व्यसनमुक्तीसाठी काम करण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०१६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून काम सुरु केले.

२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केले. व्यसनमुक्तीचे काम करणारेच सादिक शेख यांची भेट झाली. त्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या १७ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य सुरु आहे. प्रत्येक शाखाधारकाला कोल्हापूर येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन शाखा सुरु करण्यास परवानगी दिली जाते. व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन म्हणून चांगले काम करणाºया व्यक्तीस व्यसनमुक्तदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आजपर्यंत २३ जणांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच आदर्श व्यसनमुक्ती केंद्र म्हणून राजेगाव (ता. दौंड) येथील केंद्राचा गौरव केला आहे. 

उद्ध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी खटाटोपव्यसनमुक्ती केंद्रात मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येतो़ केवळ प्रबोधन करुन व्यसनमुक्त करता येणार नाही तर त्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते़ त्यासाठीच व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे़ व्यसनी लोकांचे प्रमाण कमी होईल, उद्ध्वस्त होणारे संसार वाचावेत, यासाठी हा खटाटोप असल्याचे दिगंबर साळुंखे सांगतात. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन २०१५ साली मानवाधिकार भारत समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा