शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

२४८ व्यसनमुक्त केंद्रे उभारून २५ हजार व्यक्तींना केले व्यसनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:09 IST

सांगोल्याच्या मुख्याध्यापकाने घेतला व्यसनमुक्तीचा ध्यास; उद्ध्वस्त संसार सुखी करण्याचा प्रयास

ठळक मुद्देव्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केलेकोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश

अरुण लिगाडे 

सांगोला : व्यसनामुळे कुटुंबात होणारे ताणतणाव व त्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार लहानपणीच पाहिल्यामुळे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त अभियानात काम केले़ त्यांच्या प्रेरणेने स्वत:च एक संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटकात २४८ व्यसनमुक्त केंद्रे सुरु करुन आजपर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना व्यसनांपासून दूर केले. अशा व्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.

मूळचे वाटंबरेचे व सोनंद येथील केंद्रीय आश्रमशाळेत मुख्याध्यापक असलेले दिगंबर भागवत साळुंखे यांनी १९९९ ते २००२ या काळात ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघात कासारशिरंबे काम केले. तेथील व्यसनमुक्तीवरील व्याख्याने ऐकल्यानंतर वाटंबरे या आपल्या गावी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही. मात्र व्यसनमुक्तीसाठी काम करण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०१६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून काम सुरु केले.

२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केले. व्यसनमुक्तीचे काम करणारेच सादिक शेख यांची भेट झाली. त्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या १७ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य सुरु आहे. प्रत्येक शाखाधारकाला कोल्हापूर येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन शाखा सुरु करण्यास परवानगी दिली जाते. व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन म्हणून चांगले काम करणाºया व्यक्तीस व्यसनमुक्तदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आजपर्यंत २३ जणांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच आदर्श व्यसनमुक्ती केंद्र म्हणून राजेगाव (ता. दौंड) येथील केंद्राचा गौरव केला आहे. 

उद्ध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी खटाटोपव्यसनमुक्ती केंद्रात मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येतो़ केवळ प्रबोधन करुन व्यसनमुक्त करता येणार नाही तर त्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते़ त्यासाठीच व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे़ व्यसनी लोकांचे प्रमाण कमी होईल, उद्ध्वस्त होणारे संसार वाचावेत, यासाठी हा खटाटोप असल्याचे दिगंबर साळुंखे सांगतात. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन २०१५ साली मानवाधिकार भारत समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा