शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

२४८ व्यसनमुक्त केंद्रे उभारून २५ हजार व्यक्तींना केले व्यसनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 10:09 IST

सांगोल्याच्या मुख्याध्यापकाने घेतला व्यसनमुक्तीचा ध्यास; उद्ध्वस्त संसार सुखी करण्याचा प्रयास

ठळक मुद्देव्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केलेकोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश

अरुण लिगाडे 

सांगोला : व्यसनामुळे कुटुंबात होणारे ताणतणाव व त्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार लहानपणीच पाहिल्यामुळे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त अभियानात काम केले़ त्यांच्या प्रेरणेने स्वत:च एक संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटकात २४८ व्यसनमुक्त केंद्रे सुरु करुन आजपर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना व्यसनांपासून दूर केले. अशा व्यसनमुक्त करणाºया अवलियाचे नाव आहे प्राचार्य दिगंबर साळुंखे.

मूळचे वाटंबरेचे व सोनंद येथील केंद्रीय आश्रमशाळेत मुख्याध्यापक असलेले दिगंबर भागवत साळुंखे यांनी १९९९ ते २००२ या काळात ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघात कासारशिरंबे काम केले. तेथील व्यसनमुक्तीवरील व्याख्याने ऐकल्यानंतर वाटंबरे या आपल्या गावी व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही. मात्र व्यसनमुक्तीसाठी काम करण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने २०१६ मध्ये समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून काम सुरु केले.

२०१७ मध्ये व्यसनमुक्तीवर ८५ हजार लोकांचे प्रबोधन केले. व्यसनमुक्तीचे काम करणारेच सादिक शेख यांची भेट झाली. त्यांच्या सहकार्याने व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोणताही दुष्परिणाम न होता २५ हजारांपेक्षा जास्त लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या १७ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य सुरु आहे. प्रत्येक शाखाधारकाला कोल्हापूर येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण देऊन शाखा सुरु करण्यास परवानगी दिली जाते. व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन म्हणून चांगले काम करणाºया व्यक्तीस व्यसनमुक्तदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आजपर्यंत २३ जणांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच आदर्श व्यसनमुक्ती केंद्र म्हणून राजेगाव (ता. दौंड) येथील केंद्राचा गौरव केला आहे. 

उद्ध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी खटाटोपव्यसनमुक्ती केंद्रात मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येतो़ केवळ प्रबोधन करुन व्यसनमुक्त करता येणार नाही तर त्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते़ त्यासाठीच व्यसनमुक्त भारत हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे़ व्यसनी लोकांचे प्रमाण कमी होईल, उद्ध्वस्त होणारे संसार वाचावेत, यासाठी हा खटाटोप असल्याचे दिगंबर साळुंखे सांगतात. त्यांच्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन २०१५ साली मानवाधिकार भारत समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा