शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई परिस्थिती; गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत ३३ टीएमसी पाणी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:54 IST

सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा ...

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पाच्या तलावातील पाणीही शून्य टक्क्यावरउजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे

सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी यादरम्यान धरणात १०३ टीएमसी पाणी होते. रविवारी मात्र केवळ ७०.४४ टीएमसी पाणी होते. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पाच्या तलावातील पाणीही शून्य टक्क्यावर आल्याने या तलावात ठणठणाट दिसून येत आहे.

उजनी धरणाची प्रकल्पीय पाणीसाठा ३३२0 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या प्रकल्पात १५१७ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असतो. रविवारी धरणात केवळ ६.७८ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी याच दिवशी ४0 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरणात होता. बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत असून, त्यामुळे भविष्यकालीन पाणी वाटप नियोजनावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

जवळगाव प्रकल्पाची ३४.९२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय पाणीसाठा मर्यादा आहे. यात आता ५.७३ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.२0 टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला आहे. मांगी प्रकल्पाची ३0.७२ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय मर्यादा आहे. यंदाच्या वर्षी १ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0४ टीएमसी इतकाच पाणीसाठा असल्याने हा प्रकल्प कोरडा पडला असल्याचे दिसून येते. आष्टी प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा २३.0१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी 0.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0३ टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला गेल्याने या प्रकल्पातीलही पाणी नसल्याचे स्पष्ट होत आहे. बोरी प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा २३.२९ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत १.२९ दशलक्ष घनमीटर म्हणजे 0.0५ टीएमसी इतकाच पाणीसाठा राहिला आहे. पिंपळगाव ढाळे प्रकल्पाची पाणीसाठा मर्यादा १२.६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यंदाच्या वर्षी यात पूर्णपणे शून्य टीएमसी म्हणजेच तलाव कोरडा पडला गेला आहे. 

एकरूख प्रकल्पात ५.६३ दलघमी पाणीसाठा !एकरुख प्रकल्पाची ६१ दशलक्ष घनमीटर इतकी प्रकल्पीय पाणीसाठा आहे. या प्रकल्पात रविवारी केवळ ५.६३ दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे 0.२0 टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. हिंगणी प्रकल्पाचा ४५.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा प्रकल्पीय आहे. यात यंदा ५.४0 दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ 0.१९ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला गेला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ