शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:24 IST

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

ठळक मुद्दे१२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो - लक्ष्मण ढोबळेशेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे - लक्ष्मण ढोबळे

सोलापूर : १२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो. उजनीचे पाणी पुण्यातील प्रकल्पांना नको होते. इंदापूरमधील अनेक प्रकल्पांनी क्षमतेपेक्षा जास्त पाणी घेतले. एनटीपीसी प्रकल्पाला शेतकºयांचे दोन टीएमसी पाणी देऊन अवघा शेतकरी देशोधडीला लावला,  अशी टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एका पत्रकातून केली आहे.
संजय मामांसारखा नेता केवळ स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागला.

केवळ नातेवाईकांनाच कामे मिळावीत म्हणून हलक्या राजकारणाची रीत वापरली. कोलांटउड्या मारून सर्वात जास्त सत्ता भोगणारा नेता म्हणून संजयमामांना दोष द्यावा लागेल. जिल्ह्यात सर्वच साखरसम्राटांनी टनाला सरासरी दोन हजारांचा भाव दिला. लोकनेते साखर कारखाना खासगी करून तेवढ्यावर समाधान झाले नाही. दोनशे रुपये कमी करून टनाला १८०० रुपये भाव दिला. शेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे. १० वर्षे संजय शिंदे यांनी स्वार्थासाठी समविचारी आघाडीचे नाटक वठविले.

सुडाचे राजकारण करताना जिल्ह्याचा नेता होण्यासाठी हलक्या कानाचे निरोप श्रेष्ठींना सांगण्यात धन्यता मानली तर आ. बबनदादांनी आपल्या क्षेत्रात अडथळा नको म्हणून संजयमामांना करमाळ्याकडे रेटले आणि मुलाचा राजकीय रस्ता डांबरी केला.

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही. तरीही हसतमुखरावांनी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जिल्हा २० वर्षे ताब्यात ठेवला. शिंदे हे अनिवासी सोलापूरकर असल्याने स्टेशनवरून घरी त्यांना स्वागत करून आणावे लागते.

नव्या उमेदवारास वारसा नोंदीची गरज नसल्याने उद्याच्या राजकारणात अक्कलकोट आणि दक्षिण यामध्ये कुणाला पराभूत करण्याचे कारस्थान उरत नाही. शिंदेशाहीने राजाश्रयाच्या नादात लोकाश्रय गमावला असून, वारसाला मोठे करण्याच्या नादात साथीदार दुखावले. कुठे खरटमल तर कुठे चाकोते यांना झळ लागली. एक साधारण पीएच्या कौतुकासाठी विष्णुपंतांसारखा माणूस दूर केला. वेळ आल्यावर कधी माने तर कधी साठे कुटुंबाला अपमानित केले. सतत म्हेत्रे कुटुंबाला पाण्यात पाहिले, असाही आरोप लक्ष्मण ढोबळे यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBabanrao Shindeबबनराव शिंदे