शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

सोलापुरात आधुनिक ‘लखोबा लोखंडे’च्या चौथ्या लग्नावेळी नातेवाईक चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:15 IST

सोलापूर शहर पोलीस ; तिघांविरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देतीन मुलींशी विवाह करून त्यांना पैशासाठी माहेरी हाकलून दिल्यानंतर प्रकाश जानगवळी हा पुन्हा चौथ्या पत्नीच्या शोधात होतातिघींनी सोलापूर  गाठून प्रकाश जानगवळी याच्याविरुद्ध फिर्याद दिली

सोलापूर : पहिल्या पत्नीला पैशाच्या कारणावरून मारहाण करून माहेरी पाठवले, दुसरीशी विवाह करून तीच अवस्था केली. तिसरी बरोबर विवाह करूनही तोच प्रकार सुरू ठेवला. तिघींनाही सोडून चौथ्या मुलीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो मी नव्हेच..’ या गाजलेल्या नाटकातील लखोबा लोखंडे हा प्रत्यक्षात सोलापुरात अवतरला आहे. तिन्ही बायकांनी प्रकाश याच्यासह तिघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रकाशची आई हिराबाई, भाऊ किशोर यांना अटक केली आहे.

पती प्रकाश महादेव जानगवळी (वय ४२, रा. शेळगी, सोलापूर), दीर- किशोर महादेव जानगवळी, सासू- हिराबाई महादेव जानगवळी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, प्रकाश जानगवळी हा रिक्षा चालक असून त्याने १९ फेब्रुवारी २००६ रोजी विजापूर येथील १२ वी शिकलेल्या रजनी या मुलीशी   लग्न केले. लग्नात ६ तोळे सोने आणि ५0 हजार रुपयांचा हुंडा देऊन सासरच्या लोकांनी विजापूर येथे थाटामाटात लग्न लावून दिले. दोन महिन्याचा संसार चांगला चालतो न चालतो तोच प्रकाश याने पत्नी रजनी हिला नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा सुरू केला. पैशासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली. 

रजनी हिला माहेरी सोडून आल्यानंतर सासºयाने एक लाख रुपये गोळा करून पुन्हा मुलीला प्रकाश याच्याकडे नांदण्यासाठी सोडले; मात्र पुन्हा त्याने गाडीची मागणी केली. रजनीच्या काकांनी गाय घेऊन दिली. काही दिवसानंतर पुन्हा पैशाची मागणी करू लागला. या त्रासाला कंटाळून रजनी माहेरी निघून गेली. ही संधी साधत प्रकाश याने २०१५ मध्ये पुणे येथील बी.कॉम. शिकलेल्या शिल्पा नावाच्या मुलीसोबत जवळीक साधली. तिला मी बीएसएनएलमध्ये क्लार्क असल्याचे सांगून लग्न केले. लग्नात हुंडा घेऊन रितसर शिल्पाला घरी घेऊन आला. काही दिवसातच तिच्या सोबतही त्याने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. शिल्पाही याच्या त्रासाला कंटाळून निघून गेली. 

प्रकाश याने पुन्हा २०१६ मध्ये जालना येथील सुरेखा रंगप्पा झारखंडे या मुलीशी जवळीक साधली व तिसरे लग्न केले. तिलाही प्रकाश याने काही दिवसात सासरहून पैसे आणण्याची मागणी करू लागला. सुरेखा  यांना दिवस गेल्यानंतर त्याने बाळाला जन्म देऊ नको म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरेखाही याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली. सुरेखा यांनी बाळाला जन्म दिला. तिन्ही बायका घरी नव्हत्या त्यामुळे प्रकाश जानगवळी हा बिनधास्त होता. 

समाजातील जागरुक व्यक्तीमुळे चौथा डाव फसला- तीन मुलींशी विवाह करून त्यांना पैशासाठी माहेरी हाकलून दिल्यानंतर प्रकाश जानगवळी हा पुन्हा चौथ्या पत्नीच्या शोधात होता. अशी एक मुलगी त्याने पसंत केली होती, तिच्यासोबत लग्न करण्याचा डाव आखला होता. यापूर्वी झालेले तीन लग्न लपवून तो चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्याचे स्वप्न पहात होता.  यासाठी त्याने जोरदार प्रयत्न सुरू केले होते.  या प्रयत्नात असतानाच त्याचा डाव उधळून लावण्यात आला. 

- हा प्रकार समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला समजला. या व्यक्तीने तिन्ही बायकांशी संपर्क साधून ही माहिती दिली. तिघींनी सोलापूर  गाठून प्रकाश जानगवळी याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी