शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परवाने न घेता उत्पादन; कंपोस्ट खताच्या नावाने दिली जातेय माती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:54 IST

शेतकºयांना लागला मीठाचा खडा; सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाला चालना देण्याची गरज

ठळक मुद्देपशुपालनामधून उपलब्ध होणारे शेण व वैरणीचा कचरा उकिरड्यात कुजविलेले खत शेतीसाठी फायदेशीर शेतीतील पिकाचा बराच भाग जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जातोद्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीच्या काड्याचा भुगा करून व उसाचे पाचट, बुडके शेतातच कुजवून जमीन सुपिक करण्याचा प्रयोग

राजकुमार सारोळे

सोलापूर : जिल्ह्यात बोगस रासायनिक व द्रवरूप खतांचा बाजार तेजीत असताना कंपोस्ट खताचीही हीच तºहा असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले आहे. कंपोस्ट खताच्या नावावर शेतातील मातीच शेतकºयांना भरमसाठ किमतीने विकली जात असल्याचे सांगण्यात आले.

प्रयोगशील शेतकरी उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये विविध प्रयोग करताना दिसून येत आहेत. अलीकडच्या काळात रासायनिक खताचा अतिवापर व सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावर चर्चा झाल्यानंतर कंपोस्ट व गांडूळ खताचा वापर करण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वास्तविक रासायनिक खताची मात्रा पिकाला लागू होण्यासाठी शेतजमिनीत कंपोस्ट खत असणे आवश्यक आहे. जर जमिनीत कंपोस्टचे प्रमाण नसेल तर पिकांना रासायनिक खताचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बागायती पिके विशेषत: फळपिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी कंपोस्ट खताच्या शोधात असताना दिसून येतात.

पूर्वी गावातील उकिरड्यातून शेतकºयांना कंपोस्ट खत सहज उपलब्ध होत होते. पण आता मागणी वाढली व ग्रामपंचायती कचरा गोळा करीत असल्याने उकिरडे संपत आले आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी कंपोस्ट खत बनविण्याचे प्रयोग सुरू केले. नामवंत कंपन्यात बोगसगिरी होत नाही, पण अलीकडे अनेक गावात कंपोस्टचे कारखाने विनापरवाना उघडण्यात आले आहेत. अशा कारखान्यातून लिंबोळी पेंड, मत्स, कोंबडी,शेळी लेंडी खत गोण्यातून उपलब्ध केले जात आहे.

न परवडणारे कंपोस्ट खत- शेतकºयांना कंपोस्ट खत परवडतच नाही. महागडे कंपोस्ट खत खरेदी करून शेतीत वापरल्यानंतर तितके उत्पन्न येण्याची शाश्वती नसतेच. कंपोस्ट खत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत करते व ही प्रक्रिया निरंतर चालू राहते. सॉईल कंडिशनर म्हणून हल्ली बाजारात लिंबोळी खत मोठ्या प्रमाणावर विकले जाते. छत्तीसगड, गुजरातमध्ये लिंबोळी जून व जुलै महिन्यात फक्त उपलब्ध होते. येथून महागड्या दराने लिंबोळी खरेदी करून त्यापासून खत तयार केले जाते. यामध्ये शंभर टक्के लिंबोळीच्या बियांचा लगदा असतोच असे नाही. बरेचजण यात माती मिसळून त्या दराने या खताची विक्री करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात परवाना न घेता असे कारखाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. यातही कायद्याची अडचण असल्याने कारवाई केल्यावर संबंधित कारखानदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.  

जुनेच प्रयोग ठरताहेत शेतकºयांना फायदेशीर- पशुपालनामधून उपलब्ध होणारे शेण व वैरणीचा कचरा उकिरड्यात कुजविलेले खत शेतीसाठी फायदेशीर आहे. शेतीतील पिकाचा बराच भाग जनावरांसाठी वैरण म्हणून वापरला जातो. त्यामुळे कचºयापासून कंपोस्ट ही संकल्पना अशक्य आहे. पण अलीकडे तूर, द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकरी छाटणीच्या काड्याचा भुगा करून व उसाचे पाचट, बुडके शेतातच कुजवून जमीन सुपिक करण्याचा प्रयोग करीत आहेत. यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेतकºयांनी स्वत:च कंपोस्ट खत करण्याचे हे पर्याय वापरणे आवश्यक आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfraudधोकेबाजी