शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कोविड डेथ; कोरोनातून बरे झाल्यानंतरही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:02 IST

 औषधांचा अतिरेक,काळजी न घेतल्याचाही परिणाम

सोलापूर : कोरोनातून बरा झालो म्हणजेे फिरायला मोकळा झालो, औषधोपचार बंद करु या असे अनेकांना वाटू शकतो. मात्र, हाच विचार अनेकांच्या जीवावर बेतत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. काहीजणांचा मृत्यू तर रुग्णालयातच होत आहे. सरकारी दरबारी याची कुठेही नोंद नाही. जनजागृतीचे प्रयत्नही नाहीत.

नई जिंदगी शिवगंंगा नगर येथील एका ५० वर्षीय महिलेने पालिकेच्या बॉइस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. कोरोनातून बरे झाल्या म्हणून डॉक्टरांनी त्यांना घरी पाठविले. चार दिवसानंतर पुन्हा या महिलेचा माथा गरम झाला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी या महिलेचा मृत्यू झाल्याचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितले. या महिलेला मधुमेहाचा त्रास होता.

टेेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्त्याने करमाळा येथील रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतले. बरे वाटू लागल्यानंतर डॉक्टरांंनी तीन ते चार दिवस रुग्णालयात थांबण्याचा सल्ला दिला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता तरीही ते घरी आले. चार दिवसांनी त्यांंना अर्धांगवायूचा झटका आला. यात त्यांचा एक डोळा आणि हात निकामी झाला. त्यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांची शुगर वाढली होती तर रक्तदाब कमी झाला होता. तिसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनावर मात केल्यानंतर काहींच्या मनात भीतीचे सावट असते. त्यातूून रक्तदाब वाढतो. हृदयविकाराचा त्रास असलेले रुग्ण या काळजीमुळेच दगावतात, असे निरीक्षणही महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले. शहरातील मोठ्या व छोट्या रुग्णालयांमध्ये असे मृत्यू झालेे आहेत. अनुुभवी असो वा नव्या दमाचे डॉक्टर. प्रत्येकाने हाताळलेल्या काही रुग्णांवर हे संकट कोसळलेलेे आहे.

कोरोना हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात. यासाठी वेळेवर तपासणी व उपचार आवश्यक आहेत. रक्त पातळ होण्याची औषधे घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कोरोना काळात घेतलेल्या औषधांमुळेही लिव्हरवर परिणाम होता, बुरशीजन्य आजाराचा धोका संभवितो. त्यामुळे कोरोनातूून बरे झाल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयएमए महापालिका आणि शासनाला वेळोवेळी निर्देशित करीत आहे.

- डॉ. मिलिंद शहा, अध्यक्ष, आयएमए, सोलापूर.

 

हृदयरोग, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये पोस्ट कोविडचा धोका आहे. परंतुु, यात मृत्यूूचे प्रमाण दोन ते तीन टक्केच आहे. म्युकरमायकोसिस सारखा इतर प्रकारचा संसर्गही अनेकदा होऊ शकतो. कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुुसार होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केेला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलो तर मास्कचा वापर करायचा. घरातच व्यायाम, प्राणायाम करून प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करायचा.

- डॉ. अमोल आचलेरकर, मार्कंडेय हॉस्पिटल.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केवळ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद होते. कोरोनावर मात केल्यानंतरही अनेकांचा बळी गेला आहे. याची कुठेही नोंद होत नाही. अनेेक रुग्ण न्युमोनियासदृश आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. त्याचीही कुठेही नोंद नाही.

----

कोरानानंंतर येेतोय हृदयविकाराचा धक्का

कोरोनानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचेही प्रकार घडले आहेत. लष्करमधील करण म्हेत्रे या कार्यकर्त्याचा शनिवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. म्हेत्रे यांनी कोरोनावर मात केली होती, मात्र त्यानंतर त्यांची शुुगर वाढली होती. रक्तात गुठळ्या झाल्या होत्या. यासाठी डि डायमर चाचणी करण्यात आली. या चाचणीचे प्रमाण ५०० असावे लागते. मात्र म्हेत्रे यांच्या शरीरातील प्रमाणे ४५०० वर पोहोचले होते, असेे विनीत हॉस्पिटलचे डॉ. व्ही.पी. सूर्यवंशी यांंनी सांगितले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. कोरोनावरील औषधांचाही शरिरावर परिणाम होतोय, असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलHeart Attackहृदयविकाराचा झटका