शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसेनेला विश्वासात घेतले तरच भाजपा विजयदिन पाहील; तानाजी सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:09 IST

महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा

ठळक मुद्देतुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते - सावंत भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता - सावंत

सोलापूर : गेल्या साडेचार वर्षांत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले नाही याची खंत शिवसेना पदाधिकाºयांच्या मनात आहे. या निवडणुकीत त्यांनी विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दोन देशमुखांच्या उपस्थितीत भाजपला दिला. 

महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा झाला. तानाजी सावंत म्हणाले, भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी संभ्रमात टाकण्याचे काम केले. पण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मला खेदाने सांगावे लागते की तुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते.

आपण सर्वजण विस्थापित आहोत. तळागाळातील कार्यकर्ता आपला केंद्रबिंदू मानून काम करायला हवे होते. तुम्ही या निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. कुठे काही अडचण असेल तर सांगा मी ती दूर करतो, असेही सांगायला सावंत विसरले नाहीत. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले,  तानाजी सावंत यांनी खंत व्यक्त केली. पण दोनवेळा स्वत:हून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या घरी गेलो होतो. यापुढेही सहकार्य राहिले. 

महाराज, बापू बोलले... नीलम तार्इंनी सावरले..- दोन देशमुखांच्या वादामुळे शहराचे वाटोळे झाल्याची टीका काँग्रेसवाले करतात. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येतात याबद्दल सहकारमंत्री देशमुख यांनी खंत व्यक्त केली. त्यावर नीलम गोºहे यांनी वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका. काम करत राहा. या जिल्ह्यातील पत्रकारांचे सल्ले मी सुद्धा ऐकते, असा सल्ला देशमुखांना दिला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपल्या भाषणात शिवसेनेने भाजपला खांदा द्यावा, असे सांगितले. त्यावरुन मंचावर खसखस पिकली. नीलम गोºहे या विषयावर बोलताना पालखीला खांदा दिला जातो. याचा वेगळा अर्थ काढू नका, असे सांगितले. 

मंचावर बरोबरीच्या स्थानासाठी आग्रह - या मेळाव्याला शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सावंत बंधू, महेश कोठे, गणेश वानकर यांच्यासह सेनेच्या प्रमुख महिला पदाधिकाºयांना मंचावर स्थान मिळायला हवे, याबाबत सेनेचे पदाधिकारी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे पदाधिकारी आवर्जून सर्वांना मंचावर बोलावत होते.  विशेष म्हणजे शिवसेनेच्या शहर पदाधिकाºयांनी तानाजी सावंत आणि रावसाहेब दानवे या दोघांना स्वतंत्रपणे भले मोठे हार घालून त्यांचे स्वागत केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा