शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला विश्वासात घेतले तरच भाजपा विजयदिन पाहील; तानाजी सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:09 IST

महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा

ठळक मुद्देतुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते - सावंत भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता - सावंत

सोलापूर : गेल्या साडेचार वर्षांत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले नाही याची खंत शिवसेना पदाधिकाºयांच्या मनात आहे. या निवडणुकीत त्यांनी विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी दोन देशमुखांच्या उपस्थितीत भाजपला दिला. 

महायुतीच्या पदाधिकाºयांचा विजयी संकल्प मेळावा झाला. तानाजी सावंत म्हणाले, भाजपा आणि शिवसेनेची युती झाली आहे. पण खाली कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे की नाही याबद्दल संभ्रम होता. काँग्रेसच्या नेत्यांनी संभ्रमात टाकण्याचे काम केले. पण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मला खेदाने सांगावे लागते की तुम्ही गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांना विश्वासात घ्यायला हवे होते.

आपण सर्वजण विस्थापित आहोत. तळागाळातील कार्यकर्ता आपला केंद्रबिंदू मानून काम करायला हवे होते. तुम्ही या निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेऊन काम केले तरच २३ मे रोजी विजयदिन पाहायला मिळेल, असे ते म्हणाले. कुठे काही अडचण असेल तर सांगा मी ती दूर करतो, असेही सांगायला सावंत विसरले नाहीत. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले,  तानाजी सावंत यांनी खंत व्यक्त केली. पण दोनवेळा स्वत:हून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या घरी गेलो होतो. यापुढेही सहकार्य राहिले. 

महाराज, बापू बोलले... नीलम तार्इंनी सावरले..- दोन देशमुखांच्या वादामुळे शहराचे वाटोळे झाल्याची टीका काँग्रेसवाले करतात. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येतात याबद्दल सहकारमंत्री देशमुख यांनी खंत व्यक्त केली. त्यावर नीलम गोºहे यांनी वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका. काम करत राहा. या जिल्ह्यातील पत्रकारांचे सल्ले मी सुद्धा ऐकते, असा सल्ला देशमुखांना दिला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपल्या भाषणात शिवसेनेने भाजपला खांदा द्यावा, असे सांगितले. त्यावरुन मंचावर खसखस पिकली. नीलम गोºहे या विषयावर बोलताना पालखीला खांदा दिला जातो. याचा वेगळा अर्थ काढू नका, असे सांगितले. 

मंचावर बरोबरीच्या स्थानासाठी आग्रह - या मेळाव्याला शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सावंत बंधू, महेश कोठे, गणेश वानकर यांच्यासह सेनेच्या प्रमुख महिला पदाधिकाºयांना मंचावर स्थान मिळायला हवे, याबाबत सेनेचे पदाधिकारी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. भाजपाचे पदाधिकारी आवर्जून सर्वांना मंचावर बोलावत होते.  विशेष म्हणजे शिवसेनेच्या शहर पदाधिकाºयांनी तानाजी सावंत आणि रावसाहेब दानवे या दोघांना स्वतंत्रपणे भले मोठे हार घालून त्यांचे स्वागत केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा