शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

कांदा लागवडीचा एकरी खर्च साठ हजार अन् मदत आठ हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:35 IST

शेतकºयांनी चिखलातून कांदा बाहेर काढला व बाजरी, मका ही पिके उपटून बांधावर टाकली.

ठळक मुद्दे भिवरवाडी येथील दिलीप विनायक पाटील यांचे पुतणे रवी पाटील यांनी नुकसानीचे अनुभव कथनदोन एकर मका परतीच्या पावसात सडला़ कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय यांच्याकडे हेलपाटे मारून मका पिकाचे नुकसानशेलगाव-वा, कोर्टी, रोसेवाडी, हिवरवाडी, भोसे या भागातील शिवारात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद

नासीर कबीर

करमाळा : कांदा लागवड करण्यासाठी एका हेक्टरला खर्च आला ६० हजार अन् शासन देणार हेक्टरी ८ हजार रूपये.. हा कुठला न्याय आहे? सरकारने शेती करून पाहावी मग कळेल़़़ हा संतप्त सवाल भिवरवाडी (ता.करमाळा) येथील युवा शेतकरी रवी पाटील यांनी केला आहे. ही मदत तुटपुंजी असून, राज्यपालांनी या नुकसानभरपाईवर पुनर्विचार करावा, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकºयांनी केली आहे.

आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने करमाळा तालुक्यात हातातोंडाला आलेला कांदा, बाजरी, मका या उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने जमिनीतच कांदा नासला तर मका व बाजरी चिखलात सडली. शेतकºयांनी चिखलातून कांदा बाहेर काढला व बाजरी, मका ही पिके उपटून बांधावर टाकली. महिनाभरापासून राज्यसरकार स्थापन होईना़ अखेर राष्ट्रपती राजवट लागली़ राज्याचा कारभार हाकणाºया राज्यपालांनी  पीक नुकसानग्रस्तांना हेक्टरी ८ हजार रूपये भरपाई देण्याचे जाहीर केले आहे़ ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे़ बळीराजाची एक प्रकारे चेष्टाच झाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे़ करमाळा तालुक्यात भिवरवाडी, शेलगाव-वा, कोर्टी, रोसेवाडी, हिवरवाडी, भोसे या भागातील शिवारात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद साधला.

 भिवरवाडी येथील दिलीप विनायक पाटील यांचे पुतणे रवी पाटील यांनी नुकसानीचे अनुभव कथन केले़ अडीच एकर कांदा लागवड केली होती. परतीच्या पावसाने हातातोंडाला आलेला कांदा चिखल झालेल्या पाण्यात गेला़ जिथं २०० ते २५० पिशव्या कांदा होईल असे वाटत असताना नुकसानीमुळे १० ते १५ पिशव्याच हाताला लागल्या.  एक एकर  शेत नांगरट करून मशागत करायला हेक्टरी  ५ हजार रूपये, कांदा रोप विकत आणून लागणीस १५ हजार रूपये, दोनदा खुरपणी करायला २ हजार रूपये, खते व औषधे फवारणी २ हजार रूपये अशाप्रकारे एकरी २४ हजार रूपये खर्च आला आहे़ एकूण लागवड खर्च पाहता एक हेक्टरला निव्वळ ६० हजार रूपये खर्च येत असल्याचे वास्तव अनेक शेतकºयांनी सांगितले.

मका सडली शेतात.. कांद्याचा खर्चही निघाला नाही- दोन एकर मका परतीच्या पावसात सडला़ कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय यांच्याकडे हेलपाटे मारून मका पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले़ कांद्याचा पंचनामा करण्याबाबत सूचना नसल्याचे सांगितले जात होते़  शेवटी दोघांमध्ये वाद झाला़मग पंचनामा झाला, अशी व्यथा शेलगावचे सोमनाथ केकान या शेतकºयानं व्यक्त केली तर भिवरवाडीचे रामभाऊ कांबळे म्हणाले, दीड एकर कांदा लावला होता़ परतीच्या पावसानं दहा पिशव्याही कांदा हाती लागला नाही. इंदापूरच्या अडत बाजारात ५ रूपये किलो दराने विकला. जाण्या-येण्याचा खर्च सुध्दा निघाला नाही, अशा स्थितीत सरकारनं मदत वाढवावी, असं त्यांच्या म्हणणं आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती