शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एक दिवस उपवास करून पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 13:06 IST

सोलापुरातील सुयश गुरूकुलचा उपक्रम; फळे, सरबताचा आहार घेऊन विद्यार्थ्यांचा स्वयंप्रेरणेने सहभाग

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रातील क ोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर आदी भागात पूर आलापूरग्रस्तांना खाण्या-पिण्यासोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूंची गरजअभ्यास आनंददायी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतात

सोलापूर : आपल्या खिशातील पैसे पूरग्रस्तांना देऊन मदत करण्यापेक्षा त्यांना होणारा त्रास स्वत:ला अनुभवता यावा. तसेच यातून पूरग्रस्तांना मदतही करता येईल, या उद्देशाने सुयश गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी १२ आॅगस्ट रोजी एक दिवस उपवास केला. या ऐच्छिक उपक्रमात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. उपवासाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी फळे, ज्यूस, सरबत आदी पदार्थांचा हलका आहार घेतला.

पश्चिम महाराष्ट्रातील क ोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर आदी भागात पूर आला आहे. यामुळे तेथील पूरग्रस्तांना खाण्या-पिण्यासोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूंची गरज आहे. तिथे राहणाºया नागरिकांपुढे कोणती परिस्थिती आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर व वृत्तपत्र कात्रणाच्या माध्यमातून देण्यात आली. आपण काय करू शकतो, असे विद्यार्थ्यांना विचारल्यावर त्यांनी एक दिवस उपवास करण्याची संकल्पना सांगितली. या उपक्रमात बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. थकवा येऊ नये, यासाठी फळे, ज्यूस, सरबतसारखी पेये तसेच इतर बाबींची सोयही करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना जेवण करायचे आहे त्यांना तशी परवानगी देण्यात आली.

अभ्यास आनंददायी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतात. यासाठी क्षेत्रभेटीचेही आयोजन करण्यात येते. शाळेमध्ये एनसीसीचे निवासी शिबीर घेण्यात येते. यात सुमारे ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या शिबिरात रोप ट्रेनिंग, हॉर्स रायडिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी युवा दिन साजरा करण्यात येतो. विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी गुरुकुलमध्ये येत असतात. या उपक्रमांतर्गत करिअरबाबत मार्गदर्शन केले जाते. शाळेतर्फे एक दिवसाच्या सहलीचे आयोजन करण्यात येते. या सहलीमधून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी यादृष्टीने विविध प्रकल्पांना भेट दिली जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखील साजरा करण्यात येतो. अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुलभा पिशवीकर, सचिव केशव शिंदे यांचे मार्गदर्शन असते.

पूरग्रस्तांना वही, पुस्तक ांची मदत- सुयश गुरुकुल ही निवासी शाळा असल्याने विद्यार्थी शाळेतच राहतात. या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेले वही, पुस्तक, पेन आदी शैक्षणिक साहित्यिक तसेच टूथ ब्रश, पेस्ट, चप्पल, बूट, कपडे आदी साहित्य देखील विद्यार्थ्यांनी एकत्रित केले आहेत. आणखी एक ते दोन दिवस असे साहित्य एकत्रित केल्यानंतर पूरग्रस्तांपर्यंत हे पोचविण्यात येणार आहे. गुरुकुलमधील शिक्षक तसेच कर्मचारीदेखील आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.

सुयश गुरुकुलचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना चांगला मनुष्य घडविणे हा आहे. या आधारावरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासाबरोबरच खेळ व कला यांनाही प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच शाळेमध्ये १५ प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच २४ प्रकारच्या विविध कलाही शिकविण्यात येतात. - विद्या शिंदेमुख्याध्यापिका, सुयश गुरुकुल

टॅग्स :SolapurसोलापूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSchoolशाळाEducationशिक्षण