शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

संचारबंदीची गरज नाही; सोलापुरात टाळेबंदी नको.. जमावबंदी हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 14:24 IST

उपासमार होईल; लॉकडाऊन, संचारबंदीपेक्षा अन्य पर्यायांचा विचार करावा; शहरात वावरण्यासाठीचे नियम कडक करावेत

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये बंद पडलेले स्वयंपाक घरातील मिक्सरचे भांडे दुरूस्त झालेघरातील आजारी माणसाला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे सुलभ झालेशहरातील  पन्नास हजार महिला कामगारांची रोजीरोटी सुरू झाली

रवींद्र देशमुख 

सोलापूर : कोरोना महामारीने शहरात कहर केला आहे. दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. या स्थितीत काळजी घेणे सर्वांचे कर्तव्य आहे; पण उपाययोजना म्हणून आता टाळेबंदीचा पर्याय सोडून द्यावा. त्याऐवजी कठोर जमावबंदी करावी, अशी मागणी सोलापूरकरांकडून होत आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारच्या सोलापूर दौºयात संचारबंदी लागू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकर हवालदिल झाले आहेत. अनेकजणांनी शनिवारी संचारबंदीच्या भीतीने बाजारपेठांमध्ये गर्दी करून जीवनावश्यक वस्तही खरेदी केल्या.

लॉकडाऊनच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक - १ त्यानंतर अनलॉक -२ झाले. त्यामुळे व्यापार, व्यवसायाची गाडी रूळावर येऊ लागली. कष्टकºयांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे सोलापूरकरांची सोयही झाली. लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले स्वयंपाक घरातील मिक्सरचे भांडे दुरूस्त झाले. घरातील आजारी माणसाला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे सुलभ झाले. अनलॉक झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस विडी कारखाने सुरू झाले नाहीत; पण त्यानंतर तेही सुरळीत सुरू झाले. शहरातील  पन्नास हजार महिला कामगारांची रोजीरोटी सुरू झाली.

याशिवाय सलून आणि पार्लरचा व्यवसाय सुरू झाल्यामुळे शहरवासीयांना सुविधा मिळाली आणि तेथील चालक, कामगारांच्या हाताला काम मिळाले. आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले. तर शहरातील सर्वच व्यापार, व्यवसाय ठप्प होतील. लोक पुन्हा बेरोजगार होतील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संचारबंदी किंवा लॉकडाऊनचा निर्णय घेताना सारासार विचार करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.जिल्हा प्रशासन जो काही निर्णय घेत आहे. तो शहरवासीयांना या महाभयानक रोगापासून दूर ठेवण्यासाठीच आहे; पण ही सोलापूरकरांचीही जबाबदारी आहे. त्यांनी नियमांचे पालन करून वावर करायला हवा. मास्कचा वापर करावा, डबलसीट दुचाकी प्रवास पाळावा, फिजिकल डिस्टन्स ठेवावे, असेही अनेकांनी सांगितले.

लॉकडाऊनची गरज नाही !२३ मार्चपासून ३ जूनपर्यंत केलेल्या लॉकडाऊनच्या काळात  शहरातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावर परिणाम होऊन शहराचे अर्थचक्र पूर्णपणे बंद होते. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होईल, त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही, असे वेकअप सोलापूर फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी केली. 

आमचा विरोधगेली तीन महिने लॉकडाऊनमुळे हॉटेल, दुकानामध्ये काम करणारे कामगार बेकार झाले आहेत. संचारबंदीमुळे त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था कोण करणार. संचारबंदी करून संसर्ग कमी होणार आहे काय? चाचण्या वाढविणे, अलगीकरण करणे अशा उपाययोजना प्रभावीपणे करण्याची गरज आहे.- मनोहर सपाटे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

संचारबंदी परवडणारी नाही!संचारबंदी आता परवडणारी नाही. सोलापूर कामगारांचे शहर आहे. आतापर्यंतच्या लॉकडाऊनमुळे जगण्याचा आधार हिसकावून घेतला गेला आहे. व्यापार थांबला आहे. वाजंत्री, पेंटर अशा छोट्या हातावर पोट असणाºयांचा संसार संकटात आहे. त्यामुळे अशात पुन्हा संचारबंदीला आमचा कडाडून विरोध आहे. जिथे रुग्ण आढळतात तेथे प्रतिबंध करावा.- आनंद चंदनशिवे, प्रवक्ते, बहुजन वंचित आघाडी 

भविष्य अंधारात जाईलसंचारबंदी लागू केल्यास भाजीवाल्यांचे जेवणाचेही वांदे होतील. आमचे यातूनच उत्पन्न मिळत असते, ते जर बंद झाले तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. जर उत्पन्न बंद झाले तर मुलांचे भविष्य हे अंधारातच राहील.जर आता संचारबंदी लागू केली तर भाजीवाल्यांसह अनेक लघुउद्योजकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण होईल.-अशोक राठोड, भाजी विक्रेते 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय