शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

स्वराज्य रक्षणासाठी जिभेवर नियंत्रणाची गरज, सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष रसुल पठाण यांचे मत, स्वराज्य स्थापनेत मुस्लिमांचे योगदान मोलाचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:04 IST

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली साजरी होतेय यंदा प्रथमच शिवरायांचे १९ मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या तरुणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे

बाळासाहेब बोचरे सोलापूर दि १६ : छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. केवळ विषारी प्रचारामुळे जातीय सलोखा कलुषित केला जातो, याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, असे प्रतिपादन मध्यवर्ती शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी केले. सोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली साजरी होतेय याचा मला अभिमान वाटतो, असे ते पुढे म्हणाले. छत्रपती शिवराय हे जाती-पातीपलीकडचे राजे होते. त्यांचा लढा मुघल साम्राज्याविरुद्ध असला तरी मुस्लीम समाजातील १९ शिलेदार त्यांच्या फौजेत होते. त्यांचे योगदान लाखमोलाचे होते हे आजही कोणी नाकारत नाही. या राजाबद्दल मुस्लीम समाजामध्येही कधी अनादराची भावना नव्हती आणि नाही. पण शिवजयंती साजरी करण्याची संधी आम्हाला कधी मिळाली नाही. मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन एक जाती-पातीपलीकडे जाऊन विचार करणारा निर्व्यसनी तरुण म्हणूनच माझी एकमताने अध्यक्षपदी निवड केली. ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे, तसेच शिवप्रेमींचा मनाचा मोठेपणा दर्शवणारी आहे. आपली अध्यक्षपदी निवड का झाली असे वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना रसूलभाई म्हणाले, लष्कर परिसरामध्ये जातीय सलोखा ठेवण्यात आपण मोलाचे योगदान दिले आहे. गरिबी जवळून पाहिल्याने व भोगल्याने पैशाची मस्ती कधी दाखवलीच नाही. आमचा शाब्दी सोशल ग्रुप तयार झाला आहे. त्यामुळे लष्कर मध्यवर्ती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. आम्ही अनेक चांगले बदल केले आहेत. गुलालाऐवजी फुलांची उधळण करणे, अन्नदान, पाणी वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले. त्यामुळे आपली शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठा समाजातील दास शेळके, नाना काळे, राजन जाधव या प्रमुख नेत्यांनी आपल्या नावाची शिफारस केली अन् त्याला एकमताने मंजुरी मिळाली.---------------------------मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या युवकांची मिरवणूक- अध्यक्ष या नात्याने आपणाला शिवजयंती उत्सवात काही बदल करावा वाटतो का किंवा करणार का असे विचारता रसूलभाई म्हणाले, परंपरा मोडता येत नाहीत आणि जनतेला त्रास होणार नाही, असा मधला मार्ग काढावाच लागतो. अलीकडे डॉल्बीचे फॅड आले आहे. ते आम्हाला अजिबात मान्य नाही. शिवरायांच्या काळात निरोप किंवा सांकेतिक संदेश म्हणून तोफांचे बार किंवा गवताच्या गंजी पेटवल्या जायच्या, आज त्याची गरज राहिली नाही. जल्लोष साजरा करण्याची पद्धतही बदलली पाहिजे. यंदा प्रथमच शिवरायांचे १९ मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या तरुणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय रहीम शेख या तरुणाचे व्याख्यान होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज