शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

कोरोनामुळे मध्यमवर्गीयांचे मृत्यू अधिक; श्रमिकांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:55 AM

कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण; खासगी दवाखान्यात उपचार उपलब्ध नसल्याचाही फटका

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत

समीर इनामदार

सोलापूर : सोलापुरात वाढलेल्या मृत्यूंमध्ये मध्यमवर्गीय नागरिकांचे विशेषत: श्रमिक कामगारांचे प्रमाण अधिक आहे. कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

मृत्युमुखी पडलेल्यांचा सामाजिक विचार केल्यानंतर यामध्ये रोजंदारीवर जाणाºया नागरिकांचा समावेश आहे. अशा नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते स्वत:च्या आरोग्याकडे फारसे गांभीर्याने पाहू शकत नाहीत. ‘रोज आणावे तेव्हा खावे’ अशी परिस्थिती असल्याने त्यांना कामावर जावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना औषधे आणणेदेखील परवडणारे नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सारीच्या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या साधारणत: ७९ इतकी आहे. गतवर्षी सारीमुळे मरण पावलेल्यांची संख्या ही या दोन महिन्यांत ५९ इतकी होती. खासगी दवाखाने उपलब्ध नसल्याने यंदा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे यात म्हटले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले सुमारे ८९ टक्के नागरिक हे लोकसंख्येची अत्यंत जास्त घनता असलेल्या भागात राहतात. यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणावर झाला आहे. 

त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या ३४ नागरिकांमध्ये जवळपास ८९ टक्क्यांहून अधिक प्रमाण हे ५० वर्षांवरील वयोगटातील आहे. त्याचवेळी ११ टक्के इतके प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांचे आहे. ५० कमी वय असलेल्या नागरिकांनाही इतर आजाराने ग्रासल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण हे अधिक वय आणि आजारांमुळे झाल्याचे निष्पन्न होते. 

यातील ७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत झालेले आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, हे त्यांच्या मृत्यूमागचे आणखी एक कारण असू शकते, असे यात म्हटले आहे.

५० वर्षांवरील वय...- कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार होते. उर्वरित मृतांचे वय झालेले होते. ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही, असे झालेले नाही. वयोवृद्ध झालेल्या नागरिकांचा मृत्यू अन्य दुसºयाही कारणास्तव झाला असता, त्यामुळे ते कोरोनामुळेच वारले, असे म्हणता येणार नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस