शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सोलापुरातील बांगलादेशवासीयांची मनसेकडून शोधमोहिम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 11:22 IST

पूर्व भागातील ‘तो सर्व्हे’ तत्काळ बंद करा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकाºयांकडे मागणी

ठळक मुद्देशासनामार्फत सुरू असलेला सर्व्हे बंद करण्याची मागणीविडी घरकूल परिसरात उडाला गोंधळ; परिस्थिती चिघळण्याची मास्तरांना भीती !संबंधित कर्मचाºयांना पोलीस ठाण्यात नेऊन केली चौकशी

सोलापूर : शहरातील पूर्व भागात शासनातर्फे सुरू करण्यात आलेला सर्व्हे तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर मनसेच्या  सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सोलापुरातील बांगलावासीय हुडकून काढावेत, अशी मागणी केली आहे. 

माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, रशीदा शेख, चंदा गायकवाड, अकबर लालकोट, सलीम मुल्ला, शाहबोद्दीन शेख, सत्तार शेख  यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

देशभर सध्या सीएए व एनपीआरबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत आंदोलने होत असून, मोर्चे काढून नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात आहे. अशा स्थितीत नागरी वस्तीत कोणीही जाऊन काही माहिती विचारल्यास नागरिक संशयाने बघत आहेत. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अक्कलकोट रोडवरील गांधीनगर झोपडपट्टीत दोन इसम मोबाईल  घेऊन घरोघरी माहिती संकलित करीत फिरत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यावर आम्ही जनगणनेचे कर्मचारी आहोत. आम्हाला सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्याचे सांगितले. ओळखपत्र विचारल्यावर त्यांनी खासगी कंपनीचे ओळखपत्र दाखविले आहे. याबाबत अधिक चौकशी केल्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीस कारवाई करू, अशी धमकी त्या कर्मचाºयांनी दिली. खातरजमा करण्यासाठी त्यांना एमआयडीसी पोलीस  ठाण्यात नेल्यावर त्या इसमांनी आपल्या वरिष्ठांना बोलाविले व पोलिसांना तोंडी माहिती देऊन ते निघून गेले. सर्व्हे करताना हे कर्मचारी नवीन कायदा मुस्लिमांसाठी आहे,  तुम्ही घाबरू नका असे इतरांना सांगत असल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण जनतेच्या मनात  भीती निर्माण करू शकते व परिस्थिती चिघळत जाण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यास बंदी घालावी. राजमुद्रेचा वापर करून ओळखपत्र वापरणाºया खासगी कंपनीच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, असे आडम मास्तर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

सर्वेक्षणाला विरोध करू नये- सोलापुरात शासनातर्फे सुरू असलेल्या कोणत्याही सर्वेक्षणाला विरोध करू नये. शहरातील हद्दवाढ भागात बांगलादेशीय मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून राहत असल्याची माहिती आहे. बांधकाम, फर्निचर, मिठाई या व्यवसायाच्या निमित्ताने बांगलादेशीय मोठ्या प्रमाणावर शहर आणि हद्दवाढ भागात राहावयास आले आहेत. यातील बºयाच घुसखोरांनी आता येथील कागदपत्रे बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अशा लोकांना संरक्षण देणे घातक आहे. त्यामुळे विनाकारण अशा सर्वेक्षणाला विरोध करून स्थानिक तरुणांच्या हक्काला बाधा आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ज्या भागात असे नागरिक वास्तव्यास आहेत, त्या भागातूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांगलावासीयांना हुडकून काढा, अशी मनसेची ठाम मागणी असल्याचे दिलीप धोत्रे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

केंद्र शासनामार्फत दर पाच वर्षांनी आर्थिक गणना केली जाते. हे काम करण्याची जबाबदारी कॉमन सर्व्हिस सेंटरकडे दिली आहे. ही प्रक्रिया देशभरात गेल्या आठ महिन्यांपासून  सुरू आहे. यातून शासनाला दरवर्षी नवीन उद्योगाला चालना देण्याचे निर्णय घेता येतात. त्यामुळे सर्वांनी या गणनेला सहकार्य करावे.- पुंडलिक गोडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरMNSमनसेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिस