शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील बांगलादेशवासीयांची मनसेकडून शोधमोहिम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 11:22 IST

पूर्व भागातील ‘तो सर्व्हे’ तत्काळ बंद करा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकाºयांकडे मागणी

ठळक मुद्देशासनामार्फत सुरू असलेला सर्व्हे बंद करण्याची मागणीविडी घरकूल परिसरात उडाला गोंधळ; परिस्थिती चिघळण्याची मास्तरांना भीती !संबंधित कर्मचाºयांना पोलीस ठाण्यात नेऊन केली चौकशी

सोलापूर : शहरातील पूर्व भागात शासनातर्फे सुरू करण्यात आलेला सर्व्हे तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर मनसेच्या  सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सोलापुरातील बांगलावासीय हुडकून काढावेत, अशी मागणी केली आहे. 

माजी आमदार नरसय्या आडम, नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, रशीदा शेख, चंदा गायकवाड, अकबर लालकोट, सलीम मुल्ला, शाहबोद्दीन शेख, सत्तार शेख  यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

देशभर सध्या सीएए व एनपीआरबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत आंदोलने होत असून, मोर्चे काढून नागरिकत्व कायद्याला विरोध केला जात आहे. अशा स्थितीत नागरी वस्तीत कोणीही जाऊन काही माहिती विचारल्यास नागरिक संशयाने बघत आहेत. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अक्कलकोट रोडवरील गांधीनगर झोपडपट्टीत दोन इसम मोबाईल  घेऊन घरोघरी माहिती संकलित करीत फिरत असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यावर आम्ही जनगणनेचे कर्मचारी आहोत. आम्हाला सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्याचे सांगितले. ओळखपत्र विचारल्यावर त्यांनी खासगी कंपनीचे ओळखपत्र दाखविले आहे. याबाबत अधिक चौकशी केल्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलीस कारवाई करू, अशी धमकी त्या कर्मचाºयांनी दिली. खातरजमा करण्यासाठी त्यांना एमआयडीसी पोलीस  ठाण्यात नेल्यावर त्या इसमांनी आपल्या वरिष्ठांना बोलाविले व पोलिसांना तोंडी माहिती देऊन ते निघून गेले. सर्व्हे करताना हे कर्मचारी नवीन कायदा मुस्लिमांसाठी आहे,  तुम्ही घाबरू नका असे इतरांना सांगत असल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण जनतेच्या मनात  भीती निर्माण करू शकते व परिस्थिती चिघळत जाण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यास बंदी घालावी. राजमुद्रेचा वापर करून ओळखपत्र वापरणाºया खासगी कंपनीच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, असे आडम मास्तर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

सर्वेक्षणाला विरोध करू नये- सोलापुरात शासनातर्फे सुरू असलेल्या कोणत्याही सर्वेक्षणाला विरोध करू नये. शहरातील हद्दवाढ भागात बांगलादेशीय मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून राहत असल्याची माहिती आहे. बांधकाम, फर्निचर, मिठाई या व्यवसायाच्या निमित्ताने बांगलादेशीय मोठ्या प्रमाणावर शहर आणि हद्दवाढ भागात राहावयास आले आहेत. यातील बºयाच घुसखोरांनी आता येथील कागदपत्रे बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अशा लोकांना संरक्षण देणे घातक आहे. त्यामुळे विनाकारण अशा सर्वेक्षणाला विरोध करून स्थानिक तरुणांच्या हक्काला बाधा आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ज्या भागात असे नागरिक वास्तव्यास आहेत, त्या भागातूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांगलावासीयांना हुडकून काढा, अशी मनसेची ठाम मागणी असल्याचे दिलीप धोत्रे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

केंद्र शासनामार्फत दर पाच वर्षांनी आर्थिक गणना केली जाते. हे काम करण्याची जबाबदारी कॉमन सर्व्हिस सेंटरकडे दिली आहे. ही प्रक्रिया देशभरात गेल्या आठ महिन्यांपासून  सुरू आहे. यातून शासनाला दरवर्षी नवीन उद्योगाला चालना देण्याचे निर्णय घेता येतात. त्यामुळे सर्वांनी या गणनेला सहकार्य करावे.- पुंडलिक गोडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरMNSमनसेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिस