शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

मनाला आध्यात्मिक समाधान लाभले ; सीईओ राजेंद्र भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:25 PM

पंढरपूर आषाढी वारीसाठी योगदान देणाºया सोलापूर जिल्ह्यातील महत्वांच्या अधिकाºयांची ’अधिकाºयांची वारी‘ हे ’लोकमत’ चे विशेष सदर

ठळक मुद्देआषाढी वारी हा भक्तीचा सोहळा हॅँड वॉश मोबाइल व्हॅन ही आमची यावर्षीची वेगळी संकल्पना दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक वारकºयांनी या व्हॅनचा फायदा घेतला

मागील वर्षी मी सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार घेतला. वारी तोंडावर होती. गर्दीचा आकडा ऐकून मनात चिंता आलीच होती. सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे की, या जिल्ह्यात सर्व पालख्या एकत्र येतात. दुपारचा विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात.

ग्रामसेवक, अभियंते, सरपंच, पदाधिकारी, स्वच्छता विभागातील कर्मचारी या सर्वांना घेऊन काम करायचे होते. मुख्यमंत्रीच महापूजेला येणार असल्याने त्यांना सर्व प्रकारचे रिपोर्टिंग होणार या सर्व गोष्टींचाही अंदाज आला होता; पण कामाला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी मूलभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि स्वच्छता या कामांना प्राधान्य दिले.

पालखी मार्गावर एकाचवेळी अनेक लोक चालत असल्याने आरोग्याच्या सुविधा देण्यात अडचणी येतात हे लक्षात आले. त्यावर आरोग्य दूत ही संकल्पना समोर आली. एका दुचाकीवर दोघांना बसवून मागे एका बॉक्समध्ये प्रथमोपचार साहित्य, महत्त्वाची औषधे ठेवण्यात आली. या आरोग्य दूतांनी उत्तम काम केले तसे इतर विभागांनीही चांगले काम केले. मनाला एक आध्यात्मिक समाधान लाभले. मागील वर्षीच्या अनुभवाचा यंदा खूप फायदा होतोय. 

आषाढी वारी हा भक्तीचा सोहळा आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकºयाला राहण्यासाठी कोरडी जागा, पिण्यास चांगले पाणी, शौचालये, आरोग्य सुविधा पुरविणे याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वारकरी हा मुळातच विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो, त्याला दुसरे काही दिसत नाही. गरिबातला गरीब माणूस यात सहभागी असतो.

वारकºयांच्या चेहºयावर एकप्रकारचे समाधान पाहायला मिळते. मी पाहतोय की अनेक लोक दिवसभर भजन, कीर्तन, फुगडी यामध्ये दंग असतात. एकमेकांची काळजी घेतात. ज्या परिस्थितीत आपण आलोय त्याच परिस्थितीत आनंदात जगू आणि वारी पूर्ण करू, हीच भावना त्यांच्यामध्ये दिसते. यंदाच्या वर्षीही आम्ही पालखी मार्गावरील गावांमध्ये वेळेवर अनेक कामे करून घेतली. हॅँड वॉश मोबाइल व्हॅन ही आमची यावर्षीची वेगळी संकल्पना आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आम्ही प्रत्येकी दोन व्हॅन लावल्या आहेत. दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक वारकºयांनी या व्हॅनचा फायदा घेतला आहे. वारी हे समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे, हे यातून लक्षात येते. या कामांमधून आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी विठ्ठलाची आणि वारकºयांची सेवा बजावत आहेत. शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी