शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी उजनीच्या पायथ्याशी लाखो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:38 IST

भीमा नदी पडली कोरडी; पाणीटंचाईमुळे पिकेही वाळून चालल्याने शेतकºयांमध्ये चिंता

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता आता वाढत चाललेली दिसायला लागलीकधी नव्हे ते उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाºया भीमा नदीचे पात्र कोरडेकाही दिवसांपूर्वीही उजनीतून पाणी सोडावे अशी मागणी करत शेतकºयांनी आंदोलन केले

भीमानगर : दुष्काळाची दाहकता आता वाढत चाललेली दिसायला लागली आहे.  कधी नव्हे ते उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाºया भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या पात्रात असलेले असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर काही मासे हे पात्रातील छोट्याशा डबक्यांमध्ये अखेरच्या घटका मोजत आहेत.  

माढा तालुक्यातील रांझणी, आलेगाव बुद्रुक, परिसरातील उन्हाळ्याच्या तीव्रतेने भीमा नदीचे पात्र कोरडे ठाक झाल्याने येथील लक्षावधी मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. याच परिसरातील अवसरी, बाभूळगाव,  बेडसिंगे, भांडगाव या गावातील उभ्या पिकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून या जलचराना व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

 काही दिवसांपूर्वीही उजनीतून पाणी सोडावे अशी मागणी करत शेतकºयांनी आंदोलन केले होते; मात्र याचा कसलाच परिणाम यंत्रणेवर झाला नाही. 

तीव्र उन्हामुळे नदीपात्रातील पाणी आटले आहे. लाखो जलचर चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. असंख्य चिखलात अखेरच्या घटका मोजत आहेत. या जलचरांच्या मरतुकीबरोबरच पिकेही वाळून चालल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

ही भयावह वास्तवाची चाहूलच !- पात्रात मृतावस्थेत सड्यासारखे पडून असलेले मासे खाण्यासाठी या भागात पक्षांनीही गर्दी केली आहे. अल्पश्रमात असंख्य मासे सापडत असल्याने मासेमारही गर्दी करीत आहेत. हे दुष्काळाचे चित्र भयावह असून भविष्यात जनावरे आणि पिके पाण्याविना हळूहळू जळत जाणार हे भयंकर वास्तव आहे.  मागील कित्येक दिवसात अशी परिस्थिती प्रथमच पाहावयास मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. आगामी काळातील भयावह वास्तवाची ही चाहूलच आहे की काय, या भीतीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार