शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

अरणगावच्या महिलेने साधली किमया; तीन एकरात घेतले २१ टन सेंद्रिय पेरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:49 AM

खारघर बाजारात अरणगावचे फळ; वनमाला गायकवाड शेतकरी महिलेची यशोगाथा

ठळक मुद्देबार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधलीअरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात

बालाजी विधातेकारी : गावचा शिवार तसा मुरमाडच... कुसळ उगवायला देखील मुश्कील... अशा जमिनीत फळबागेची लागवड केली. तीन एकरावर पेरूची लागवड केली़ या लागवडीपूर्वी मशागत आणि त्याच्याबरोबर रासायनिक खत पूर्णत: टाळून गोमूत्र, काळा गूळ, शेण आणि बेसन पिठाच्या मिश्रणातून जीवामृत वापरले़ अभ्यासू वृत्तीने केलेल्या लागवडीतून दहा महिन्यांत २१ टन सेंद्रिय पेरूचे फळ घेतले आहे़ आज ही फळं मुंबईतील खारघर परिसरातील बाजारात सर्वाधिक दराने विकली जात आहेत.

बार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधली आहे़ दोन मुलं अभियंते आहेत़ परंतु त्यांचा शिक्षणाकडे ओढा असल्याने त्या स्वत: शेतीकडे लक्ष देतात. अरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख निर्माण झाली आहे़ वनमाला यांना वडिलोपार्जित २० एकर जमीन आहे. शेतामध्ये पेरूच्या एक हजार रोपांची लागवड केली. या जमिनीमध्ये त्यांनी पेरू हे मुख्य फळ आणि याच्याबरोबरीने आंबा व   जांभूळ, बांबू अशी इतर पिके त्या घेताहेत.

त्यांनी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली आहे. ८ बाय ८ अंतराने पेरूची रोपं लावली आहेत. फळाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला नसून, कीटकनाशक म्हणून गोमूत्र फवारले आहे. खताचा पूरक डोस म्हणून जीवामृतचा वापर केला आहे. हे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने अंबविण्याची प्रक्रियाद्वारे वापरली आहे़ देशी गाईचे शेण, गोमूत्र, काळा गूळ आणि बेसन पीठ यांच्या मिश्रणातून हे तयार केले़ ही रोपं जगवण्यासाठी दीड एकर क्षेत्रात २़५ कोटी लिटरचे शेततळे उभारले आहे़ त्यात मत्स्यपालनही केले आहे. ठिबक सिंचनाचा आणि जीवामृतचा वापर केला आहे. याशिवाय आठवड्यातून दोन वेळा फवारण्या केल्या़ फळवाडीपोटी एकरी १५ हजार रुपये खर्च आला आहे.

कृषीभूषण पुरस्काराने गौरव - वनमाला गायकवाड यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेऊन  बार्शी  कृषी पदवीधर संघटनेने घेऊन सन २०१९ चा ‘भगवंत कृषीभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कृषी सहायक बाळासाहेब चापले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून ही शेती विकसित करायला मदत केली आहे़ 

भविष्यात शेती फायदेशीर ठरणार आहे. परंतु शेतकºयाने प्रत्येक कामाचा हिशोब ठेवला पाहिजे. कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात कशी राहील, याचा विचार करणे गरजेचे आहे़ अभ्यासू वृत्तीने शेती केल्यास उत्पन्न वाढते, अपेक्षित निकाल हाती येतो.- वनमाला गायकवाड, पेरू उत्पादक महिला शेतकरी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळेorganic vegetablesसेंद्रिय भाज्या