शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

शेतीमालासाठीही मॉल संस्कृती रूजली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:29 IST

भारत शेतीप्रधान देश आहे.

भारत शेतीप्रधान देश आहे. आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलं वाक्य. परंतु, शेतीला प्राधान्य देणारी व्यवस्था मात्र इथे नाही, शेती पिकवताना शेतकºयाला होणाºया कष्टाचे महत्त्व एसीरूम शेअर करणाºयाला कसं कळेल. १० रू.ला किलोग्रॅम मिळणाºया टोमॅटोचे भाव वधारले की, आपले कान टवकारतात, परंतु त्याच टोमॅटोपासून बनलेल्या सॉसच्या पॉकेटमागच्या भरमसाठ किमती न पाहता मॉलचे गल्ले भरतो. आपल्याला जगण्यासाठी शेती व शेतीमालाचे अनन्य साधारण महत्त्व आहे हेच आपण विसरत चाललोय. फास्टफूडमधील पिझ्झा, बर्गर, वडा, भजी, दोसा, इडली, पावभाजीचा संबंध शेतीमालाशी नाही असे आपण कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणू शकतो.

रानातील ढेकळं फुटून पुन्हा ढेकळं बनेपर्यंत कोणकोणत्या क्रिया घडतात याची कल्पनासुद्धा नसेल यांना. जून महिन्याची धून चांगली वाजेल या आशेवर जगणाºया जुलै ते आॅक्टोबर ओलांडले तरी पाऊस नाही पडला तर शेतकºयाची काय अवस्था होते हे त्यालाच माहीत. अचानक कोसळणारा वादळी पाऊस, पिकांची रास होऊन धान्य गोणपाटात बंद होईपर्यंत निर्माण होणारी आस्मानी व सुलतानी संकटे आणि एवढी संकटे पेलूनही दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. अशाही परिस्थितीतून काढलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने तो आणखी मरणयातना सोसतो आहे़ भाजीपाला घेण्यासाठी परवा मंडई गेलो असतानाची घटना आहे.

एका माणसाभोवती गराडा घालून काही लोक मोठमोठ्या आवाजात बोलत होते. सहज लक्ष गेलं तर एक वयस्कर शेतकरी कोथिंबिरीने भरलेलं गोणपाट एकरकमी विकण्याचा प्रयत्न करत होता. गराडा घातलेले लोक अगदी दोन रूपयांपासून एकेक जुडी मागत होते. म्हटलं थोडं पाहावं काय घडतंय ते. त्या गर्दीतील संवाद काहीसे असे होते, एक जुडी दोन रूपयाला करून दे. एवढे लहान जुडी असतात का? आम्हाला नाही परवडत बाबा तुझे रेट. कस्टमर तर देतील का जास्त भाव? आम्हाला दिवसभर बसून विकावं लागतं इथं....... शेवटचं सांगतो पाचला एक जुडी भाव लावून दे...’ वाढलेली कलकल पाहून त्या वयस्कर शेतकºयाने पाच रूपयाला एक जुडी या भावाने भाजीपाल्याने भरलेले ते गोणपाट देऊन नाराज मनाने घरचा रस्ता धरला. हे सर्व मी बारकाईने पाहत होतो. भाजीपाल्याने भरलेले ते गोणपाट घेऊन तो दलाल आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसला.

माझं लक्ष होतंच तिकडं एकेक जुडी सोडून, एकाचे दोन जुडी करून तो जोरजोराने आवाज देऊ लागला, मेथी घ्या मेथी दहा रूपयाला एक मेथी.... आणि त्याच्याकडे भाजीला आलेली सुशिक्षितांची गर्दी वळली आणि मी सुन्न मनाने तिथून विचारांची फैरी स्वत:वरच झाडत निघालो. दिवसभर काबाडकष्ट करून पाच रूपयाला एक जुडी देऊन गेलेला शेतकरी आणि त्या जुडीतून पंधरा रुपये नफा कमवणारा दलाल... दोघेही माझ्या मनाला अस्थिर करून गेले.

आपण मॉलमध्ये जाऊन घेतलेल्या एका बिस्किटाच्या पॉकेटाची अथवा एका साबणाच्या वडीची देशभरात कुठेही सारखीच किंमत दिसेल. अगदी तसंच काहीसं शेतीमालाच्या बाबतीत घडलं तर काय बिघडणार आहे...?- आनंद घोडके(लेखक जि. प. शिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMarketबाजारFarmerशेतकरी