शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शेतीमालासाठीही मॉल संस्कृती रूजली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:29 IST

भारत शेतीप्रधान देश आहे.

भारत शेतीप्रधान देश आहे. आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलं वाक्य. परंतु, शेतीला प्राधान्य देणारी व्यवस्था मात्र इथे नाही, शेती पिकवताना शेतकºयाला होणाºया कष्टाचे महत्त्व एसीरूम शेअर करणाºयाला कसं कळेल. १० रू.ला किलोग्रॅम मिळणाºया टोमॅटोचे भाव वधारले की, आपले कान टवकारतात, परंतु त्याच टोमॅटोपासून बनलेल्या सॉसच्या पॉकेटमागच्या भरमसाठ किमती न पाहता मॉलचे गल्ले भरतो. आपल्याला जगण्यासाठी शेती व शेतीमालाचे अनन्य साधारण महत्त्व आहे हेच आपण विसरत चाललोय. फास्टफूडमधील पिझ्झा, बर्गर, वडा, भजी, दोसा, इडली, पावभाजीचा संबंध शेतीमालाशी नाही असे आपण कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणू शकतो.

रानातील ढेकळं फुटून पुन्हा ढेकळं बनेपर्यंत कोणकोणत्या क्रिया घडतात याची कल्पनासुद्धा नसेल यांना. जून महिन्याची धून चांगली वाजेल या आशेवर जगणाºया जुलै ते आॅक्टोबर ओलांडले तरी पाऊस नाही पडला तर शेतकºयाची काय अवस्था होते हे त्यालाच माहीत. अचानक कोसळणारा वादळी पाऊस, पिकांची रास होऊन धान्य गोणपाटात बंद होईपर्यंत निर्माण होणारी आस्मानी व सुलतानी संकटे आणि एवढी संकटे पेलूनही दिवसेंदिवस घटत चाललेल्या पर्जन्यमानामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. अशाही परिस्थितीतून काढलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने तो आणखी मरणयातना सोसतो आहे़ भाजीपाला घेण्यासाठी परवा मंडई गेलो असतानाची घटना आहे.

एका माणसाभोवती गराडा घालून काही लोक मोठमोठ्या आवाजात बोलत होते. सहज लक्ष गेलं तर एक वयस्कर शेतकरी कोथिंबिरीने भरलेलं गोणपाट एकरकमी विकण्याचा प्रयत्न करत होता. गराडा घातलेले लोक अगदी दोन रूपयांपासून एकेक जुडी मागत होते. म्हटलं थोडं पाहावं काय घडतंय ते. त्या गर्दीतील संवाद काहीसे असे होते, एक जुडी दोन रूपयाला करून दे. एवढे लहान जुडी असतात का? आम्हाला नाही परवडत बाबा तुझे रेट. कस्टमर तर देतील का जास्त भाव? आम्हाला दिवसभर बसून विकावं लागतं इथं....... शेवटचं सांगतो पाचला एक जुडी भाव लावून दे...’ वाढलेली कलकल पाहून त्या वयस्कर शेतकºयाने पाच रूपयाला एक जुडी या भावाने भाजीपाल्याने भरलेले ते गोणपाट देऊन नाराज मनाने घरचा रस्ता धरला. हे सर्व मी बारकाईने पाहत होतो. भाजीपाल्याने भरलेले ते गोणपाट घेऊन तो दलाल आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसला.

माझं लक्ष होतंच तिकडं एकेक जुडी सोडून, एकाचे दोन जुडी करून तो जोरजोराने आवाज देऊ लागला, मेथी घ्या मेथी दहा रूपयाला एक मेथी.... आणि त्याच्याकडे भाजीला आलेली सुशिक्षितांची गर्दी वळली आणि मी सुन्न मनाने तिथून विचारांची फैरी स्वत:वरच झाडत निघालो. दिवसभर काबाडकष्ट करून पाच रूपयाला एक जुडी देऊन गेलेला शेतकरी आणि त्या जुडीतून पंधरा रुपये नफा कमवणारा दलाल... दोघेही माझ्या मनाला अस्थिर करून गेले.

आपण मॉलमध्ये जाऊन घेतलेल्या एका बिस्किटाच्या पॉकेटाची अथवा एका साबणाच्या वडीची देशभरात कुठेही सारखीच किंमत दिसेल. अगदी तसंच काहीसं शेतीमालाच्या बाबतीत घडलं तर काय बिघडणार आहे...?- आनंद घोडके(लेखक जि. प. शिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMarketबाजारFarmerशेतकरी