शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 10:51 IST

केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

सोलापूर : केळी उत्पादन व निर्यातीत अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र यंदा डाळिंबाबाबत खोड कीड रोग व नैसर्गिक आपत्तीच्या अटॅकने पिछाडीवर आला आहे. केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राला मागे टाकत पश्चिम बंगालने मोठी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत पाऊस चांगला पडतो आहे. सरासरी एवढा व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद होत आहे. पाणी मुबलक असल्याने राज्यात यंदा ऊस व केळीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होत आहे. उच्चांकी साखर उत्पादनाप्रमाणे केळी उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संपूर्ण भारतातून फेब्रुवारीअखेर ३ लाख ३३ हजार २६६ मे. टन केळी विविध देशांना निर्यात झाली आहे. आजपर्यंत डाळिंब लागवड व उत्पादनात महाराष्ट्राच्या जवळपासही इतर कोणतेच राज्य नव्हते. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात डाळिंबावर खोड कीड रोगाने एकदम अटॅक केला आहे. यामध्ये झाडावर परिणाम झालाच, शिवाय उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

 

  • संपूर्ण देशात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंबाची निर्यात फेब्रुवारीपर्यंत २० हजार मे. टनाने वाढली असताना महाराष्ट्रात मात्र वाढण्याऐवजी तीन हजार टन निर्यात घटली आहे.
  • * मागील वर्षी (२०२०-२१) भारतातून ६७ हजार ९७६ मे. टन डाळिंबाची निर्यात झाली होती. त्यातून देशाला ५१६ कोटी रुपये परकीय चलन मिळाले होते. यावर्षी (२०२१-२२) फेब्रुवारीपर्यंत ८७ हजार ८७४ मे. टन डाळिंब निर्यातीतून शेतकऱ्यांना ६०२ कोटी रुपये मिळाले आहेत.
  • देशातील संपूर्ण राज्ये एकीकडे तर एकटा महाराष्ट्र केळी निर्यातीत भारी ठरला आहे.
  • २०२०-२१ मध्ये २ लाख ३२ हजार ५१८ केळी निर्यातीतून देशाला ७४० कोटी तर २१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ३३ हजार २६५ मे. टन केळी निर्यातीतून देशाला १ हजार ३५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले आहे.
  • २१-२२ मध्ये महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या २ लाख ४१ हजार ५०९ मे. टन केळी निर्यातीतून ८०५ कोटी तर २०-२१ मध्ये १ लाख ६३ हजार ६२५ मे. टन केळी निर्यातीतून ५५६ कोटी परकीय चलन मिळाले होते.
  • * २०२१-२२ मध्ये १४६०४ मे. टन डाळिंब निर्यातीतून महाराष्ट्राला २०९ कोटी तर २०२०-२१ मध्ये १७७२४ मे. टन डाळिंब निर्यातीतून २२३ कोटी रुपये मिळाले होते.

राज्यातील विशेषत: सोलापूर, सांगली, इंदापूर भागातील डाळिंब पीक खोड किडीने उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खर्च करून आणलेले डाळिंब पीक वाचविण्यासाठी पुन्हा खर्चाचा भार सोसला आहे.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळे