शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 10:51 IST

केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

सोलापूर : केळी उत्पादन व निर्यातीत अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र यंदा डाळिंबाबाबत खोड कीड रोग व नैसर्गिक आपत्तीच्या अटॅकने पिछाडीवर आला आहे. केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राला मागे टाकत पश्चिम बंगालने मोठी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत पाऊस चांगला पडतो आहे. सरासरी एवढा व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद होत आहे. पाणी मुबलक असल्याने राज्यात यंदा ऊस व केळीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होत आहे. उच्चांकी साखर उत्पादनाप्रमाणे केळी उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संपूर्ण भारतातून फेब्रुवारीअखेर ३ लाख ३३ हजार २६६ मे. टन केळी विविध देशांना निर्यात झाली आहे. आजपर्यंत डाळिंब लागवड व उत्पादनात महाराष्ट्राच्या जवळपासही इतर कोणतेच राज्य नव्हते. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात डाळिंबावर खोड कीड रोगाने एकदम अटॅक केला आहे. यामध्ये झाडावर परिणाम झालाच, शिवाय उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

 

  • संपूर्ण देशात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंबाची निर्यात फेब्रुवारीपर्यंत २० हजार मे. टनाने वाढली असताना महाराष्ट्रात मात्र वाढण्याऐवजी तीन हजार टन निर्यात घटली आहे.
  • * मागील वर्षी (२०२०-२१) भारतातून ६७ हजार ९७६ मे. टन डाळिंबाची निर्यात झाली होती. त्यातून देशाला ५१६ कोटी रुपये परकीय चलन मिळाले होते. यावर्षी (२०२१-२२) फेब्रुवारीपर्यंत ८७ हजार ८७४ मे. टन डाळिंब निर्यातीतून शेतकऱ्यांना ६०२ कोटी रुपये मिळाले आहेत.
  • देशातील संपूर्ण राज्ये एकीकडे तर एकटा महाराष्ट्र केळी निर्यातीत भारी ठरला आहे.
  • २०२०-२१ मध्ये २ लाख ३२ हजार ५१८ केळी निर्यातीतून देशाला ७४० कोटी तर २१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ३३ हजार २६५ मे. टन केळी निर्यातीतून देशाला १ हजार ३५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले आहे.
  • २१-२२ मध्ये महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या २ लाख ४१ हजार ५०९ मे. टन केळी निर्यातीतून ८०५ कोटी तर २०-२१ मध्ये १ लाख ६३ हजार ६२५ मे. टन केळी निर्यातीतून ५५६ कोटी परकीय चलन मिळाले होते.
  • * २०२१-२२ मध्ये १४६०४ मे. टन डाळिंब निर्यातीतून महाराष्ट्राला २०९ कोटी तर २०२०-२१ मध्ये १७७२४ मे. टन डाळिंब निर्यातीतून २२३ कोटी रुपये मिळाले होते.

राज्यातील विशेषत: सोलापूर, सांगली, इंदापूर भागातील डाळिंब पीक खोड किडीने उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खर्च करून आणलेले डाळिंब पीक वाचविण्यासाठी पुन्हा खर्चाचा भार सोसला आहे.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळे