शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 10:51 IST

केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

सोलापूर : केळी उत्पादन व निर्यातीत अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र यंदा डाळिंबाबाबत खोड कीड रोग व नैसर्गिक आपत्तीच्या अटॅकने पिछाडीवर आला आहे. केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राला मागे टाकत पश्चिम बंगालने मोठी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत पाऊस चांगला पडतो आहे. सरासरी एवढा व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद होत आहे. पाणी मुबलक असल्याने राज्यात यंदा ऊस व केळीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होत आहे. उच्चांकी साखर उत्पादनाप्रमाणे केळी उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संपूर्ण भारतातून फेब्रुवारीअखेर ३ लाख ३३ हजार २६६ मे. टन केळी विविध देशांना निर्यात झाली आहे. आजपर्यंत डाळिंब लागवड व उत्पादनात महाराष्ट्राच्या जवळपासही इतर कोणतेच राज्य नव्हते. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात डाळिंबावर खोड कीड रोगाने एकदम अटॅक केला आहे. यामध्ये झाडावर परिणाम झालाच, शिवाय उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

 

  • संपूर्ण देशात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंबाची निर्यात फेब्रुवारीपर्यंत २० हजार मे. टनाने वाढली असताना महाराष्ट्रात मात्र वाढण्याऐवजी तीन हजार टन निर्यात घटली आहे.
  • * मागील वर्षी (२०२०-२१) भारतातून ६७ हजार ९७६ मे. टन डाळिंबाची निर्यात झाली होती. त्यातून देशाला ५१६ कोटी रुपये परकीय चलन मिळाले होते. यावर्षी (२०२१-२२) फेब्रुवारीपर्यंत ८७ हजार ८७४ मे. टन डाळिंब निर्यातीतून शेतकऱ्यांना ६०२ कोटी रुपये मिळाले आहेत.
  • देशातील संपूर्ण राज्ये एकीकडे तर एकटा महाराष्ट्र केळी निर्यातीत भारी ठरला आहे.
  • २०२०-२१ मध्ये २ लाख ३२ हजार ५१८ केळी निर्यातीतून देशाला ७४० कोटी तर २१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ३३ हजार २६५ मे. टन केळी निर्यातीतून देशाला १ हजार ३५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले आहे.
  • २१-२२ मध्ये महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या २ लाख ४१ हजार ५०९ मे. टन केळी निर्यातीतून ८०५ कोटी तर २०-२१ मध्ये १ लाख ६३ हजार ६२५ मे. टन केळी निर्यातीतून ५५६ कोटी परकीय चलन मिळाले होते.
  • * २०२१-२२ मध्ये १४६०४ मे. टन डाळिंब निर्यातीतून महाराष्ट्राला २०९ कोटी तर २०२०-२१ मध्ये १७७२४ मे. टन डाळिंब निर्यातीतून २२३ कोटी रुपये मिळाले होते.

राज्यातील विशेषत: सोलापूर, सांगली, इंदापूर भागातील डाळिंब पीक खोड किडीने उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खर्च करून आणलेले डाळिंब पीक वाचविण्यासाठी पुन्हा खर्चाचा भार सोसला आहे.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळे