शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 10:51 IST

केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

सोलापूर : केळी उत्पादन व निर्यातीत अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र यंदा डाळिंबाबाबत खोड कीड रोग व नैसर्गिक आपत्तीच्या अटॅकने पिछाडीवर आला आहे. केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राला मागे टाकत पश्चिम बंगालने मोठी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत पाऊस चांगला पडतो आहे. सरासरी एवढा व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद होत आहे. पाणी मुबलक असल्याने राज्यात यंदा ऊस व केळीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होत आहे. उच्चांकी साखर उत्पादनाप्रमाणे केळी उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संपूर्ण भारतातून फेब्रुवारीअखेर ३ लाख ३३ हजार २६६ मे. टन केळी विविध देशांना निर्यात झाली आहे. आजपर्यंत डाळिंब लागवड व उत्पादनात महाराष्ट्राच्या जवळपासही इतर कोणतेच राज्य नव्हते. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात डाळिंबावर खोड कीड रोगाने एकदम अटॅक केला आहे. यामध्ये झाडावर परिणाम झालाच, शिवाय उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

 

  • संपूर्ण देशात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंबाची निर्यात फेब्रुवारीपर्यंत २० हजार मे. टनाने वाढली असताना महाराष्ट्रात मात्र वाढण्याऐवजी तीन हजार टन निर्यात घटली आहे.
  • * मागील वर्षी (२०२०-२१) भारतातून ६७ हजार ९७६ मे. टन डाळिंबाची निर्यात झाली होती. त्यातून देशाला ५१६ कोटी रुपये परकीय चलन मिळाले होते. यावर्षी (२०२१-२२) फेब्रुवारीपर्यंत ८७ हजार ८७४ मे. टन डाळिंब निर्यातीतून शेतकऱ्यांना ६०२ कोटी रुपये मिळाले आहेत.
  • देशातील संपूर्ण राज्ये एकीकडे तर एकटा महाराष्ट्र केळी निर्यातीत भारी ठरला आहे.
  • २०२०-२१ मध्ये २ लाख ३२ हजार ५१८ केळी निर्यातीतून देशाला ७४० कोटी तर २१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ३३ हजार २६५ मे. टन केळी निर्यातीतून देशाला १ हजार ३५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले आहे.
  • २१-२२ मध्ये महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या २ लाख ४१ हजार ५०९ मे. टन केळी निर्यातीतून ८०५ कोटी तर २०-२१ मध्ये १ लाख ६३ हजार ६२५ मे. टन केळी निर्यातीतून ५५६ कोटी परकीय चलन मिळाले होते.
  • * २०२१-२२ मध्ये १४६०४ मे. टन डाळिंब निर्यातीतून महाराष्ट्राला २०९ कोटी तर २०२०-२१ मध्ये १७७२४ मे. टन डाळिंब निर्यातीतून २२३ कोटी रुपये मिळाले होते.

राज्यातील विशेषत: सोलापूर, सांगली, इंदापूर भागातील डाळिंब पीक खोड किडीने उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खर्च करून आणलेले डाळिंब पीक वाचविण्यासाठी पुन्हा खर्चाचा भार सोसला आहे.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारfruitsफळे