शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

भाजपाबरोबर युती न केल्यास शिवसेनेचे नुकसान : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:35 IST

सोलापूर : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे़ त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात़ युती करण्यासाठी भाजप तयार आहे, मात्र जर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली तर भाजपपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे़ युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे़ उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले आहे़ ...

ठळक मुद्दे तिसरी आघाडी अपयशी ठरेल - आठवले९ लाखांपेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत साहित्य दिले - आठवलेअनेक राज्यांतील स्थानिक पक्षांमध्ये मतभेद - आठवले

सोलापूर : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे़ त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात़ युती करण्यासाठी भाजप तयार आहे, मात्र जर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली तर भाजपपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे़ युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे़ उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले आहे़ सत्तेतील हे दोन पक्ष विभक्त झाल्यास राज्याचेही मोठे नुकसान होणार आहे़ काहीही झाले तरी आरपीआय मात्र भाजपसोबत राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले़ 

पंढरपूर दौºयावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, कीर्तीपाल सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, महादेव भालेराव, अशोक सरवदे, आतिश हाडमोडे, रामभाऊ गायकवाड, दीपक चंदनशिवे, अर्जुन मागाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़

कर्नाटक राज्यातील निवडणुकीनंतर कुमारस्वामी यांच्या शपथविधीला देशातील भाजपविरोधी सर्व पक्षांचे प्रमुख एकत्र आले़ त्यानंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून लढण्याची चर्चा सुरू झाली, मात्र ही तिसरी आघाडी अपयशी ठरेल, कारण त्या-त्या राज्यात स्थानिक पक्षांमध्ये मतभेद आहेत़ ते कदापी एकत्र येऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले़ 

रामदास आठवले म्हणाले, तिसºया आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांच्याकडे दिले आहे, मात्र यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष खा़ राहुल गांधी हे मागे पडतील़ शिवाय अनेक राज्यांतील स्थानिक पक्षांमध्ये मतभेद आहेत़ त्यामुळे भाजप विरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल़

नंदूरबार येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले आहे़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे सांगून जातनिहाय जनगणनेविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले, केवळ ओबीसीची जनगणना नको तर देशातील जेवढ्या जाती आहेत, त्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना व्हावी, म्हणजे कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे कळेल़ एस़ सी़, एस़ टी़ आणि ओबीसी यांचे आरक्षण वगळून आरक्षणासाठी जो समाज आंदोलन करीत आहे, त्यांना आरक्षण द्यावे़ देशात दिव्यांगांसाठी ७ हजार ठिकाणी शिबीर घेऊन ९ लाखांपेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत साहित्य दिले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv Senaशिवसेना