शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धर्मविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना सैन्यदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:26 IST

दैनंदिन जीवनात आपण आपल्या जबाबदाºया पार पाडत असतो. पण एक सैनिक म्हणून देशसेवा करताना मला प्रचंड अभिमान वाटतो. निस्सीम, ...

दैनंदिन जीवनात आपण आपल्या जबाबदाºया पार पाडत असतो. पण एक सैनिक म्हणून देशसेवा करताना मला प्रचंड अभिमान वाटतो. निस्सीम, नि:स्वार्थीपणे देशवासीयांसाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे आपण देतो. देशाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला मान असतो. भाषा, धर्म, जात, पंथ, प्रांत हे काही माहिती नसते. आपण सगळे भारतीय आहोत, हेच सैनिक म्हणून माहिती असते.

आमचे कुटुंब सैनिकी वारसा लाभलेले. माझे वडील स्व. लक्ष्मण आगावणे यांनी १९६२, ६५ व ७१ च्या युद्धात भाग घेतला. विपरीत परिस्थितीत नामोहरम करून मिळालेली पदके प्रेरणा देतात. मी स्वत:ही श्रीलंकेत शांती सेनेचा (आयपीकेएफ) हिस्सा होतो. आॅपरेशन पवन, आॅपरेशन रक्षक, पंजाबमध्ये उग्रवाद शिखरावर असताना तिथे केलेली सेवा आणि नंतर बेअंत सिंग यांचे स्थापन झालेले सरकार ही केलेल्या कामाची निष्पत्ती होती. जम्मू-काश्मीरसह देशाच्या विविध भागात राजस्थान, पंजाब, सिक्कीम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्टÑ, तामिळनाडू या राज्यात सैनिकी सेवा बजावण्याचे भाग्य लाभले. जम्मू-काश्मीरमध्ये काम करताना त्यावेळच्या फारुख अब्दुल्ला सरकारने उत्कृष्ट सेवेबद्दल केलेला गौरव ही माझी कामगिरी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सैनिक होण्याची खुमखुमी कायम होती. अशातच १९८५ साली मी सैन्यात दाखल झालो. सैन्यात असताना पदवी, स्वास्थ्य निरीक्षक डिप्लोमा, संगणक यांची पदवी मिळविली. पत्रकारितेची पदवी मिळविता आली नाही, ही खंत माझ्या मनाला आहे. सैनिक म्हणून काम करताना भारताच्या अनेक भागात फिरता आले. भारतामधील सर्व प्रांतातील लोक या ठिकाणी एकत्र येतात. ज्या ट्रेडमधून तुमची निवड झाली, त्याच ट्रेडमध्ये शेवटपर्यंत काम करायचे. या ठिकाणी तुमची जात, धर्म पाहिले जात नाही. एखाद्याने स्वयंपाकी म्हणून अर्ज केला असेल तर त्याला त्याच क्षेत्रात काम करावे लागते. त्याचे प्रशिक्षणही दिले जाते. इतर कोणत्याही कारणाने ते काम नाकारता येत नाही. सैनिकी संस्था म्हणजे अगदी बारा बलुतेदारांप्रमाणे. समाजाने केलेल्या सर्वच वर्गातील लोकांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. सफाई कामापासून उच्चपदस्थ कमांडरपर्यंत आपापल्या जबाबदाºया पार पाडत असतात. देशातील सर्वोच्च आणि सुरक्षिततेची जबाबदारी असणारी संस्था (सैन्यदल, नौदल, वायुदल) ही कोणत्याही जात, धर्म, पंथाविना चालते. विविधतेतून एकता हे सैन्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकात्मतेचे सुंदर उदाहरण म्हणजे सैनिक.

वयाच्या ४१ व्या वर्षी मी सेवानिवृत्त झालो. पुणे महापालिका, जि़प़ पुणे येथे आरोग्य निरीक्षक म्हणून निवड झाली. सैन्यदलातील अनुभव पाठीशी होता. तो सामान्य जनतेच्या उपयोगी पडणार होता. पगार आणि सोयीसुविधांचा विचार न करता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचे ठरवून जि़प त आलो. सेवानिवृत्तीनंतर ज्यावेळी सामान्यांमध्ये आलो त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जाती-धर्मावरून होणारे वादविवाद, राजकारण, समाजकारण, अर्थकारण. हे विचार आकलनाच्या पलीकडचे आहेत. आपण आपल्याच माणसाच्या जीवावर उठलोय, याचे भान देखील काहींना नाही. यामुळे देशाचे किती नुकसान होते आहे, याचा मागमूसही या लोकांना नाही.  

ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, छ. शाहू, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा टिळक-आगरकर असतील या सर्वांनी कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता समाजप्रबोधनाचे काम केले. यांनी दिलेली जात-धर्मविरहित विचारांची संकल्पना पुढे नेणे आवश्यक आहे. आपण जात-धर्मविरहित समाजाची संकल्पना का मांडू शकत नाही, हा खरा सवाल आहे. साक्षरता, शिक्षण यातून सुशिक्षित समाज निर्माण होऊन सामाजिक समता, बंधुता वाढीस लागावी अशी अपेक्षा होती. आता आपणच ठरवायचे आहे, आपण कुठे आहोत? देशासाठी काय करणे गरजेचे आहे? कोणताही भेदभाव नसणारा समाज निर्माण झाल्यास आरक्षणाची गरजच लागणार नाही. सगळ्या गोष्टी गुणवत्तेवर असतील. असा समाज मी सैन्यात पाहिला आहे, म्हणून अशी तळमळ निर्माण होणे गरजेचे आहे.         - सूर्यकांत आगवणे         (लेखक हे माजी सैनिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरIndian Armyभारतीय जवानPoliceपोलिस