शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

लर्निंग लायसन्सचा उडाला बोजवारा

By admin | Updated: August 6, 2014 01:17 IST

सर्व्हर ठप्प : दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी खर्च करावा लागतो दिवस

सोलापूर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लर्निंग लायसन्स विभागातील सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सर्व संगणक ठप्प झाले. त्यामुळे दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना अख्खा दिवस खर्च करावा लागला. संगणकात होणाऱ्या बिघाडामुळे अनेक उमेदवारांना नापासाचा शेरा मारून त्यांना पुन्हा आठ दिवसांनी येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक उमेदवार हताश होऊन अखेर एजंटांकडे जात आहेत. ही संगणकीय यंत्रणा एजंटांना चालना देण्यासाठीच तयार केली असल्याची शंका उमेदवारांनी व्यक्त केली.सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (डेप्युटी आरटीओ) शहरापासून (एसटी स्टँड) तब्बल साडेसहा किमी लांब असलेल्या सुंंदरम नगर येथे स्थलांतरित होऊन सुमारे दहा वर्षे उलटली. नवीन इमारत, चाचणी धावपट्टीचे थाटात उद्घाटन होऊनही पाच वर्षे उलटून गेली मात्र अद्याप लर्निंग लायसन्स देणाऱ्या व्यवस्थेची यंत्रणा परिपूर्ण झाली नाही. लर्निंग लायसन्स काढायला येणाऱ्यांची भली मोठी संख्या त्या तुलनेने परीक्षेसाठी उपलब्ध असणारे तुटपुंजे संगणक, त्यातही ऐन परीक्षेत ठप्प होणारा सर्व्हर आणि दुपारच्या वेळी एजंटांची थेट परीक्षागृहात होणारी घुसखोरी यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालातील लर्निंग लायसन्स विभागाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. आरटीओ कार्यालयाची नवीन इमारत उभी राहिली तेव्हा त्याच्या दुसऱ्या मजल्यावर लर्निंग लायसन्ससाठी पहिल्यांदा संगणकीकृत परीक्षा सुरु झाली. एकाचवेळी ३० उमेदवार परीक्षा देऊ शकतील अशी व्यवस्था येथे निर्माण केली होती. मात्र सर्व उमेदवारांसाठी एकाच मोठ्या स्क्रीनवर प्रश्न विचारले जात असल्याने या चाचणीवेळी एकमेकांशी चर्चा करुन वा कॉपी करुन उत्तर देण्यावर नियंत्रण मिळत नव्हते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून येथील संपूर्ण यंत्रणा उलचून मुख्य इमारतीच्या मागील भागात हलविण्यात आली. तीन खोल्या आणि पत्राशेडमध्ये असलेल्या ठिकाणी जागा मोठी असली तरी केवळ १८ संगणक असल्यामुळे एकाच वेळी १८ उमेदवार या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. शिवाय त्यातील काही संगणक नेहमीच नादुरुस्त असल्याने त्यामध्ये आणखी घट होते. अनेक वेळा सर्व्हरमध्ये बिघाड झाला की सर्व संगणक ठप्प होतात. ते दुरुस्तीसाठी अभियंत्याला बोलावण्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सुमारे दोन तास लागतात़ त्यामुळे दहा मिनिटांच्या परीक्षेसाठी उमेदवारांना अख्खा दिवस वाया घालवावा लागतो. शिवाय लायसन्स काढण्यासाठीचे टप्पे कसे आहेत हे दर्शवणारा फलकही दर्शनीय ठिकाणी लावला नाही, त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ आणि कर्मचाऱ्यांना सूचनांसाठी कायम तोंडाचा पट्टा सुरु ठेवावा लागतो. एखादाही कागद अपुरा ठरणार असेल तर त्याला समजावून सांगण्याऐवजी बाहेरचा रस्ता दाखवला जातो. जणू उमेदवार हाताश होऊन एजंटाकडेच जावा हाच उद्देश असतो.---------------------------------------चाचणी धावपट्टीपेक्षाही कठीण...पक्के लायसन्स मिळविताना गाडी चालविण्याच्या चाचणी परीक्षेसाठी हजारो रुपये खर्च करुन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. चालक वाहन चालविण्यात तरबेज आहे की नाही हे तपासण्यासाठी या चाचणी धावपट्टीवर उतार-चढ, गोलाकार वळण, बोगदा असे अनेक अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. मात्र त्यापेक्षा कठीण मार्ग लर्निंग लायसन्स विभागाकडे जाणारा आहे. पावसामुळे प्रचंड चिखलमय झालेल्या या कच्च्या रस्त्यावर वाहनावरून जाणे लांबच मात्र पायी जातानाही कसरत करावी लागते. नवीन रिक्षाधारकांना पासिंगसाठी अशा चिखलातूनच नव्या रिक्षा घेऊन जावे लागते़ त्यामुळे गाडीला नंबर आणि चिखल आधी लागतो. किमान हा रस्ता तरी व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.