शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

बार्शी तालुक्यातील ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:13 PM

मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली; तुरीचे क्षेत्र टिकून

ठळक मुद्देमृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरीमूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटलीपावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी:  तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे व पुढेही पाऊस पडेल या आशेने तालुक्यातील शेतकºयांनी ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रांवर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली असून, तुरीचे क्षेत्र मात्र टिकून आहे. 

तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी तालुक्यात खरिपाचे उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून खरिपाचे क्षेत्र वाढत आहे़ पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस पडला़  त्यामुळे खरिपाची पेर मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही भागात अद्यापही तुरीची पेरणी होताना दिसत आहे़ आजअखेर तालुक्यात सरासरी १२६़१८  मि़ मी़ एवढा पाऊस पडला आहे़  खरीप हंगामात तुरीच्या सरासरी १२,९३१ हेक्टर क्षेत्रापैकी ११००५(८५ टक्के) म्हणजे सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे़. तर मुगाचे क्षेत्र १६३  वरुन २२१३ (१३५८ टक्के )  हेक्टरवर गेले आहे तर उडदाच्या पेरणीमध्ये देखील वाढ होऊन १,८९२ हे़ वरुन ७४५५हे़(३४२ टक्के) एवढे वाढले आहे़

गेल्या काही वर्षांपासून पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीन व उडदाचे पीक काढून रब्बीची ज्वारी घेता येत असल्याने या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली होती; मात्र मागील वर्षी उडीद व तुरीला दर कमी मिळाल्यामुळे यंदा या दोन्ही पिकासह मुगाची पेरणी ही कमी झाली आहे़ सोयाबीनचे क्षेत्रही यंदा घटले आहे़ 

यंदा पेरणी झालेले व मागील वर्षीचे तुलनात्मक क्षेत्र- तूर -११००५-१४१९९ , मूग १६३- ३०३१ , उडीद  ६४७५- १३९९८, भुईमूग ४१-१४९ , सोयाबीन १९०२८-३३२८७ , कापूस १७३-१५० , मका ७३९-१०५३ , कडवळ,खरीप मक्यासह एकूण चारापिके ८९९- ९०६ हेग़ाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस ६५५५ हे़नवीन लागवड यंदा झाली नाही़  ३३८९ हे़ वर विविध प्रकारची फळपिके आहेत़ सर्व पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने सुरू आहे़ असाच अधूनमधून पाऊस पडत गेल्यास पिके चांगल्या पद्धतीने वाढतील असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

यंदा नवीन उसाची लागवड नाही- गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक एकर देखील नवीन उसाची लागवड झालेली नव्हती; मात्र मागील दोन वर्षांत दमदार पाऊस पडल्यामुळे तालुक्यात ऊस लागवड झाली होती़ मागील वर्षीचाच  तालुक्यातील ६५५५ हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध होणार आहे अत्यल्प क्षेत्रावर कांद्याची रोपे टाकलेली आहेत़ त्यामुळे किती क्षेत्रावर कांदा लागवड होणार हे अद्याप समजू शकले नाही़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी