शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 10:52 AM

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, ...

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, अबरचबर खाल्ले गेल्याने पोट खराब होण्याची शक्यता आणि अॅसिडिटीचा आजार वाढला आहे. मिठाई आणि पारंपरिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपरिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसानदेखील करतात. हे पदार्थ अॅसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढवतात. अॅसिडिटी झाल्यामुळे छातीत होणारी जळजळ शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर अनेकजण करत असतात. मात्र अतिजास्त प्रमाणात औषधांचा वापर केल्यास मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे.

---

अॅसिडिटी का होते

वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत.

---

तळलेले, मसालेदार पदार्थ टाळा

अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटामध्ये जळजळ होणे, गॅस, अपचन, मळमळ होणे, उलटी होणे, शौचालयास त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, मूळव्याध आणि नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती डॉक्टर सिंह यांनी दिली आहे. तिखट, मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे. तसेच बेसनाचे पदार्थ, बटाटे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. यासाठी हलका आहार घ्यावा तसेच वरण, भात, पोळी, जेवणात तुपाचा वापर करावा. योग्य औषधोपचारासोबत केळी, डाळिंब, सफरचंद अशी फळे खावीत.

---

रोज सकाळी लिंबूपाणी घ्या

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबूपाणी घेतल्याने शरीर साफ होते, लिंबूपाणी शरीरातील पाचकरसांना उत्तेजित करते. यामुळे पाचनक्रिया सुधारते. लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबूपाण्याने हा त्रास दूर होतो, लिंबूपाण्यामुळे मुखदुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.

---

अॅसिडिटी होऊ नये म्हणून आपण जेवण आणि झोपण्याची वेळ पाळणे गरजेचे आहे. याशिवाय तेलकट, तिखट आणि मसालेदार जेवण खाण्याऐवजी साधे जेवण केल्यास अॅसिडिटीपासून बचाव करू शकतो. वेळीच आजाराचे निदान करून तातडीने औषधोपचार करून घ्यावे.

- डॉ. मनोज कोरे, जनरल फिजिशियन

---

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2021