शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पती गेले.. आधार गेला..तीन एकर जिरायतीवर सन्मानानं जगतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:00 PM

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष; देवगावच्या सुरेखा पाटील म्हणतात.. मुलांना खूप शिकवायचंय

बार्शी: शेतात चार पैसे मिळावेत म्हणून खासगी आणि सहकारी सोसायटीचं कर्ज घेतलं. पुढं निसर्गाच्या अवकृपेमुळे कर्ज फिटेना म्हणून वयाच्या ३५ व्या वर्षी शेतकरी पती उद्धव पाटील (देवगाव) यांनी १४ डिसेंबर २०१४ मध्ये आत्महत्या केली. पती गेले.. आधार गेला. दोन कच्चीबच्ची मुलं. सरकारकडं मदत मागितली, पण मिळाली नाही. तीन एकर जिरायतीवर सन्मानानं जगतोय. पतीनं निराश होऊन आत्महत्या केली, पण मुलांना कणखर बनवेन. त्यांना खूप मोठं झालेलं बघायचंय, असा आशावादी दृष्टिकोन सुरेखा पाटील यांनी व्यक्त केला. 

कै .उद्धव पाटील यांना दोन मुले आहेत़ त्यांनी आत्महत्या केली तेव्हा ते इयत्ता तिसरी आणि चौथीला शाळेत शिकत होते़ आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याकडे सोसायटीचे नव्वद हजार रुपये कर्ज होते, ते तसेच आहे़ सरकारकडे मदत मागितली; मात्र ही शेतकरी आत्महत्या नसल्याचे सांगत शासनाने मदत केली नाही़ साडेतीन एकर जिरायती जमिनीवर स्वत: सुरेखा पाटील काम करीत आहेत़ सासºयांचेही निधन झाले. घरी वृद्ध सासू आणि दोन्ही मुलांचा सांभाळ करीत त्यांचा संघर्ष सुरू आहे.कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने थोडासा आधार मिळाला आहे़ दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च शेतातील उत्पन्नावर करून त्या संसाराचा गाडा हाकत आहेत़ मुलांना उच्चशिक्षित करून मोठे करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSuicideआत्महत्याagricultureशेतीbarshi-acबार्शी