शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

सांडपाण्यावरील गवतामुळे भागतेय पाच हजारपेक्षा जास्त जनावरांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:06 PM

गवताचा सोलापुरी पॅटर्न; शहर, परिसरातील पशुपालकांकडून खरेदी

ठळक मुद्देसोलापूर शहरातून मंगळवेढ्याकडे जाणाºया रस्त्यावर दुतर्फा दिसणारी हिरवीगार शेती पाहिल्यावर कोकणातील भातशेती वाटते. शहरातील गवळी बांधवांसह हिरज, देगाव, डोणगाव आदी परिसरातील शेतकरी येथून मोठ्या प्रमाणात हा हिरवा चारा आपल्या जनावरांसाठी घेऊन जातातएका एकरातील गवत २० ते २५  जनावरांना महिनाभर पुरेल इतके असते, जनावरांना दिवसभरात जितके खाद्य दिले जाते

यशवंत सादूल 

सोलापूर :   नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा. पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा जनावरांच्या चाºयाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यातील कित्येक गावातून चारा छावण्या उभ्या करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सोलापूर शहर व परिसरातील जवळपास साडेचार ते पाच हजार जनावरांचा चारा प्रश्न मिटला आहे. देगाव आणि रुपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या सांडपाण्यावर येणाºया पुणेरी गवताच्या सोलापुरी पॅटर्नमुळे शक्य झाले.

सोलापूर शहरातून मंगळवेढ्याकडे जाणाºया रस्त्यावर दुतर्फा दिसणारी हिरवीगार शेती पाहिल्यावर कोकणातील भातशेती वाटते. तसेच दृश्य तुळजापूर रस्त्यावर रुपाभवानी मंदिर परिसरात दिसून येते. हा सगळा परिसर शहरातील नाल्यातून आलेल्या सांडपाण्यावर उगविलेली गवत शेती आहे. देगाव परिसरात अशा प्रकारची २५० ते ३०० एकर शेती आहे.  शहरातील गवळी बांधवांसह हिरज, देगाव, डोणगाव आदी परिसरातील शेतकरी येथून मोठ्या प्रमाणात हा हिरवा चारा आपल्या जनावरांसाठी घेऊन जातात.

तुळजापूर रोडवर १५० एकर परिसरात ही गवतशेती आहे.  शहरातील अशोक चौक, मार्कंडेय उद्यान परिसरातून येणाºया नाल्यातून हे सांडपाणी तुळजापूर रोडवरील ओढ्यात जाते. त्याच ठिकाणी  अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’  येथून सांडपाणी वाहून येते. हे वाया जाणारे घाण पाणी वापरून ही शेती केली जात आहे. त्यासाठी नाममात्र पाणीपट्टी मनपा आकारते. शहरातील गवळी बांधव आपल्या गायी, म्हशीसाठी येथील चारा मोठ्या प्रमाणात उपयोगात आणतात.  यासोबत हिप्परगा, एकरुख, उळे, हगलूर, बाळे, भोगाव, तामलवाडी आदी ग्रामीण भागातील शेतकरी जनावरांना वैरण म्हणून हे गवत घेऊन जातात.

पुण्यात रुजले म्हणून पुणेरी गवत !- पुण्यामध्ये सांडपाण्यावर या प्रकारचे गवत मोठ्या प्रमाणावर वाढते. या गवताचा चाºयासाठी उपयोग होऊ शकतो, हे ध्यानात आल्यानंतर सोलापुरात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या गवत शेतीसाठी कोणत्याही प्रकारची मशागत गरजेची नाही. गवताचे रोपटे एकदा लावले की वर्षानुवर्षे गवत उगवत जाते. नाल्यातील घाणपाणी  गुरुत्वाकर्षणाने व काही ठिकाणी विद्युत मोटारीने उपसा करून शेतात सोडले जाते.

वीज बिल नाममात्र पाणीपट्टी याशिवाय कोणताही अतिरिक्त खर्च नाही. दहा दिवसाला एकदा पाणी देण्यात येते. एका महिन्यात अडीच फूट गवत येते. एका एकरातील गवत २० ते २५  जनावरांना महिनाभर पुरेल इतके असते. जनावरांना दिवसभरात जितके खाद्य दिले जाते. त्यातील ६० टक्के खाद्य म्हणजे हे पुणेरी गवत. त्यासोबत कडबा, मकवान, कडवळ तीस टक्के देतात. तर काही गोपालक शंभर टक्के पुणेरी गवतच देतात.त्यामुळे  दुधावर कोणताही परिणाम होत नाही असे देगाव येथील शेतकरी बिरप्पा व्हनमाने यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRainपाऊस