शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

सख्खा भाऊ पक्की मैत्री; अडीच एकरांत घेतले चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 16:11 IST

लिंबू उत्पादनातून दोघा भावांनी साधली किमया; मुंबईच्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव

ठळक मुद्देशेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केलीदोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले़ तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत२० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली़ लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली

 संभाजी मोटे 

वाळूज : वडिलांच्या २५ एकरात पारंपरिक पिकेच़़़ दोन बांधवांना वाटले प्रयोग करावा... अत्यल्प पाणी, मनुष्यबळ आणि कमी खर्चातल्या लिंबाची लागवड केली... मिश्रखते, निंबोणी खताच्या माध्यमातून तीन वर्षांनंतर पहिल्याच फळपिकाने चार लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे़ स्थानिक बाजार पेठेपेक्षा मुंबईतील वाशीच्या बाजारपेठेत एका डागाला ४०० रुपयांचा दर मिळाला. ही किमया साधली आहे मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथील आतकरे कुटुंबातील दोन बांधवांनी.

विकास आणि प्रकाश आतकरे असे त्या दोन बांधवांची नावे़ त्यांच्या वडिलांची पारंपरिक २५ एकर शेती आहे. परंतु ते जुन्या पद्धतीने ज्वारी, गहू, हरभरा, ऊस ही पिके घेत होते. शेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केली. दोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत.या दोन बंधूंनी पाच वर्षांपूर्वी कागदी लिंबाची अडीच एकरात लागवड केली़ २० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली. लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली. एप्रिल आणि मे माहिन्यात संपूर्ण बागेत वाढलेले तण काढून घेतले़ उन्हाळ्यामध्येच भरपूर शेणखत टाकले.

लिंबाचा हंगाम हा बारा महिने आहे. त्यामुळे दररोज पैसे मिळवून देणारे उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जाते़ लिंबावर डाग पडणे म्हणजेच (कँकर) हा मुख्य रोग आहे. तसेच मूळकुज (खोडकिडा) म्हणजे झाड वठणे हे प्रामुख्याने रोग येतात. या रोगावर मात करीत संपूर्ण २५० झाडं जगवली. नुआन कराटे, बाविस्टिन ही औषधे फवारून बाग जोपासली. मिश्र खते, निंबोणी खत, २६:२६ ही रासायनिक खते आणि शेणखत टाकून बाग वाढवली. वर्षभरात खुरपणी, रासायनिक खते, औषधे आणि शेणखत यांचा मिळून खर्च २५ हजार झाला. तसेच पहिल्याच वर्षी एकूण २० किलोप्रमाणे एक हजार डाग उत्पादन निघाले़ एका डागाला त्यांना ४०० रुपये दर मिळाला. एकूण वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपये मिळाले. निघालेला सर्व माल मुंबईच्या वाशी बाजारपेठेत विक्री पाठविला.

चमेली बोराचे आंतरपीक वडिलांच्या २५ एकर  शेतीतून काय पिके  घ्यायची, यावर आम्ही दोघा भावांनी नियोजन केले़ या बागेच्या जोरावरच चमेली वाणाच्या बोराचीही लागवड केली. तसेच शेती करत-करत  गावात दूध व्यवसाय चालू केला. लिंबाच्या माध्यमातून दररोज पैसे मिळतात़ त्यामुळे पैशाची अडचण केव्हाच जाणवली नाही़ लिंबामुळे आतकरे कु टुंबाच्या वैभवात भर पडली. 

कोणतेही पीक हे प्रयोगशील पद्धतीने घ्यावे. त्यामुळे नियोजन होते आणि भरपूर पीक घेता येते़ आज देगावमधल्या लिंबाला स्थानिक बाजारपेठ असतानाही वाशीच्या बाजारपेठेने चांगला दर मिळाला़ इतर नगदी पिकांपेक्षाही अधिक उत्पादन घेता आले ते केवळ नियोजनामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे.

- विकास आतकरे, लिंबू उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल