शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

सख्खा भाऊ पक्की मैत्री; अडीच एकरांत घेतले चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 16:11 IST

लिंबू उत्पादनातून दोघा भावांनी साधली किमया; मुंबईच्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव

ठळक मुद्देशेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केलीदोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले़ तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत२० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली़ लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली

 संभाजी मोटे 

वाळूज : वडिलांच्या २५ एकरात पारंपरिक पिकेच़़़ दोन बांधवांना वाटले प्रयोग करावा... अत्यल्प पाणी, मनुष्यबळ आणि कमी खर्चातल्या लिंबाची लागवड केली... मिश्रखते, निंबोणी खताच्या माध्यमातून तीन वर्षांनंतर पहिल्याच फळपिकाने चार लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे़ स्थानिक बाजार पेठेपेक्षा मुंबईतील वाशीच्या बाजारपेठेत एका डागाला ४०० रुपयांचा दर मिळाला. ही किमया साधली आहे मोहोळ तालुक्यातील देगाव (वा.) येथील आतकरे कुटुंबातील दोन बांधवांनी.

विकास आणि प्रकाश आतकरे असे त्या दोन बांधवांची नावे़ त्यांच्या वडिलांची पारंपरिक २५ एकर शेती आहे. परंतु ते जुन्या पद्धतीने ज्वारी, गहू, हरभरा, ऊस ही पिके घेत होते. शेतीमध्ये वडिलांना मदत करत-करत विकास आणि प्रकाश यांनी शेती करण्यास सुरुवात केली. दोघांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिसरे बंधू गणेश हे पूर्णवेळ सहशिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालयात काम करताहेत.या दोन बंधूंनी पाच वर्षांपूर्वी कागदी लिंबाची अडीच एकरात लागवड केली़ २० बाय २० अंतरावर २५० झाडांची लागवड केली. लागवड केल्यापासून तिसºया वर्षी प्रथम फळ तोडणीला सुरुवात झाली. एप्रिल आणि मे माहिन्यात संपूर्ण बागेत वाढलेले तण काढून घेतले़ उन्हाळ्यामध्येच भरपूर शेणखत टाकले.

लिंबाचा हंगाम हा बारा महिने आहे. त्यामुळे दररोज पैसे मिळवून देणारे उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जाते़ लिंबावर डाग पडणे म्हणजेच (कँकर) हा मुख्य रोग आहे. तसेच मूळकुज (खोडकिडा) म्हणजे झाड वठणे हे प्रामुख्याने रोग येतात. या रोगावर मात करीत संपूर्ण २५० झाडं जगवली. नुआन कराटे, बाविस्टिन ही औषधे फवारून बाग जोपासली. मिश्र खते, निंबोणी खत, २६:२६ ही रासायनिक खते आणि शेणखत टाकून बाग वाढवली. वर्षभरात खुरपणी, रासायनिक खते, औषधे आणि शेणखत यांचा मिळून खर्च २५ हजार झाला. तसेच पहिल्याच वर्षी एकूण २० किलोप्रमाणे एक हजार डाग उत्पादन निघाले़ एका डागाला त्यांना ४०० रुपये दर मिळाला. एकूण वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपये मिळाले. निघालेला सर्व माल मुंबईच्या वाशी बाजारपेठेत विक्री पाठविला.

चमेली बोराचे आंतरपीक वडिलांच्या २५ एकर  शेतीतून काय पिके  घ्यायची, यावर आम्ही दोघा भावांनी नियोजन केले़ या बागेच्या जोरावरच चमेली वाणाच्या बोराचीही लागवड केली. तसेच शेती करत-करत  गावात दूध व्यवसाय चालू केला. लिंबाच्या माध्यमातून दररोज पैसे मिळतात़ त्यामुळे पैशाची अडचण केव्हाच जाणवली नाही़ लिंबामुळे आतकरे कु टुंबाच्या वैभवात भर पडली. 

कोणतेही पीक हे प्रयोगशील पद्धतीने घ्यावे. त्यामुळे नियोजन होते आणि भरपूर पीक घेता येते़ आज देगावमधल्या लिंबाला स्थानिक बाजारपेठ असतानाही वाशीच्या बाजारपेठेने चांगला दर मिळाला़ इतर नगदी पिकांपेक्षाही अधिक उत्पादन घेता आले ते केवळ नियोजनामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे.

- विकास आतकरे, लिंबू उत्पादक 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल