शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

भटक्या वस्त्यांचा निधी खर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:29 PM

अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नसल्याचे सांगण्यात आले.राज्य ...

ठळक मुद्देनव्याने बृहत आराखडे तयार करुन सादर करण्यासाठी पत्रनव्याने आराखडे ग्रामपंचायतींनी तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आवाहन विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन

अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी निधी मंजूर झाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नसल्याचे सांगण्यात आले.

राज्य शासन लमाण समाज व भटक्यांच्या वस्त्यांच्या विकासासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून निधी दिला जातो. एकूण मिळणाºया निधीपैकी ५० टक्के निधी लमाण समाजाच्या वस्ती(तांडा)साठी व ५० टक्के निधी भटक्या समाजाच्या वस्तीसाठी दिला जावा असा नियम आहे. १७-१८ या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्याला ३ कोटी रुपये निधी आला होता. त्यापैकी दीड कोटी रुपयांची कामे ४१ लमाण तांड्यासाठी तर दीड कोटीचा निधी भटक्यांच्या ५४ वस्त्यांसाठी मंजूर केला होता. यातून सिमेंट रस्ते व गटार,  पिण्याचे पाणी व अन्य कामांचा समावेश आहे. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली कामे मंजूर झाली. या कामांची मंजूर यादी त्या-त्या तालुक्यांच्या गटविकास अािधकाºयांना देण्यात आली. मार्चमध्ये मंजूर कामांची यादी सामाजिक न्याय विभागाने पंचायत समितीला दिली असली तरी अद्याप अनेक ग्रामपंचायतींनी कामेच सुरू केली नाहीत. जूनअखेरपर्यंत ३७ लाख ६३ हजार रुपये इतका खर्च झाला असून दोन कोटी ६२ लाख रुपये अद्यापही अखर्चित आहेत.

  • - जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना समितीत २४ जानेवारी २०१७ च्या शासन आदेशानुसार बदल करुन जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीची रचना करण्यात आली.
  • - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता, सर्व गटविकास अधिकारी व अन्य अधिकाºयांचा या समितीत समावेश करण्यात आला. 
  • - मागील पाच वर्षांच्या बृहत आराखड्यानुसार जिल्ह्यात १४५ लमाण तांडे व ४६१० भटक्यांच्या वस्त्या आहेत. आलेला निधी मात्र ५० टक्के लमाण तांडे व ५० टक्के भटक्यांच्या( धनगर, वडार, रामोशी व अन्य भटक्या समाजाच्या) वस्त्यांना मंजूर करण्याचा नियम आहे.
  • - उत्तर तालुक्यात चार तांडे व दोन वस्त्या, बार्शी तालुक्यात दोन तांडे व ७ वस्त्या, अक्कलकोट तालुक्यात १२ तांडे व १७ वस्त्या, दक्षिण तालुक्यात १४ तांडे व ३ वस्त्या, मोहोळ तालुक्यात ५ तांडे व चार वस्त्या, मंगळवेढा तालुक्यात ४ तांडे व ७ वस्त्या, करमाळा व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एक वस्ती, सांगोला तालुक्यात चार वस्त्या, माढा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी तीन वस्त्या, याप्रमाणे ४१ तांडे व ५४ वस्त्यांसाठी कामे मंजूर झाली आहेत. 
  •  

नवे बृहत आराखडे - सामाजिक न्याय विभागाने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना नव्याने बृहत आराखडे तयार करुन सादर करण्यासाठी पत्र दिले आहे; मात्र गटविकास अधिकाºयांंकडून प्रतिसाद मिळत नसल्याने २०१८-१९ या वर्षासाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. लवकरात लवकर नव्याने आराखडे ग्रामपंचायतींनी तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद