शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका

By appasaheb.patil | Updated: November 1, 2022 18:08 IST

ऊसदरासंदर्भात जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना एकाेप्याचे आवाहन

सोलापूरदहिहंडीमधील गाेविंदांना आरक्षण, डीजेला १२ वाजेपर्यंत परवानगी अशा नकाे त्या विषयांवर संवेदनशील असलेले सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील साखर आयुक्तालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. शेट्टी म्हणाले, राज्यातील साखर कारखाने उसाच्या गाळपात १० ते १२ टक्के काटा मारतात. मागील वर्षीचा विचार केला तर किमान १ काेटी ३२ लाख टनाची चाेरी झाली. याचा राज्यातील साखरेतील दराेडखाेरांनी साडेचार हजार काेटी रुपयांची चाेरी केली. साखर कारखान्यांनी ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विटंल दराने साखरेची विक्री केली. या व्यतिरिक्त इथेनाॅलची विक्री माेठ्या प्रमाणावर झाली. यातून मिळालेल्या उत्पन्नातून किमान २०० रुपये जादा देणे शक्य आहे. हा पैसा मिळालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

--

कृषीमंत्री जास्त अनुभवी असल्यासारखे वाटते, सत्तार यांना टाेला

राज्यातील नव्या सरकारने १०० दिवस पूर्ण केले. सरकारची कामगिरी समाधानकारक नाही. अतिवृष्टीमुळे ऊस वगळता एकही पीक शिल्लक राहिलेले नाही. आम्ही शिवारात फिरताे, आम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे. मात्र कृषीमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे सांगत आहेत. कदाचित त्यांना आमच्यापेक्षा जास्त कळतं, असा टाेला शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला.

---

महाआघाडीचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे

महाविकास आघाडी सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजप सरकारच्या काळात देशात ७०० शेतकऱ्यांची हत्या झाली. त्यामुळे या दाेनपैकी काेणासाेबतच आम्ही जाणार नाही. निवडणुका लढविणे हा आमचा धंदा नाही. आम्ही केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी सभागृहात लाेकप्रतिनिधी हवेत म्हणून निवडणुका लढविल्या, असेही शेट्टी म्हणाले.

-----

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने