शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका

By appasaheb.patil | Updated: November 1, 2022 18:08 IST

ऊसदरासंदर्भात जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना एकाेप्याचे आवाहन

सोलापूरदहिहंडीमधील गाेविंदांना आरक्षण, डीजेला १२ वाजेपर्यंत परवानगी अशा नकाे त्या विषयांवर संवेदनशील असलेले सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल असंवेदनशील आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील साखर आयुक्तालयावर माेर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. शेट्टी म्हणाले, राज्यातील साखर कारखाने उसाच्या गाळपात १० ते १२ टक्के काटा मारतात. मागील वर्षीचा विचार केला तर किमान १ काेटी ३२ लाख टनाची चाेरी झाली. याचा राज्यातील साखरेतील दराेडखाेरांनी साडेचार हजार काेटी रुपयांची चाेरी केली. साखर कारखान्यांनी ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विटंल दराने साखरेची विक्री केली. या व्यतिरिक्त इथेनाॅलची विक्री माेठ्या प्रमाणावर झाली. यातून मिळालेल्या उत्पन्नातून किमान २०० रुपये जादा देणे शक्य आहे. हा पैसा मिळालाच पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

--

कृषीमंत्री जास्त अनुभवी असल्यासारखे वाटते, सत्तार यांना टाेला

राज्यातील नव्या सरकारने १०० दिवस पूर्ण केले. सरकारची कामगिरी समाधानकारक नाही. अतिवृष्टीमुळे ऊस वगळता एकही पीक शिल्लक राहिलेले नाही. आम्ही शिवारात फिरताे, आम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे. मात्र कृषीमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे सांगत आहेत. कदाचित त्यांना आमच्यापेक्षा जास्त कळतं, असा टाेला शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला.

---

महाआघाडीचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे

महाविकास आघाडी सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भाजप सरकारच्या काळात देशात ७०० शेतकऱ्यांची हत्या झाली. त्यामुळे या दाेनपैकी काेणासाेबतच आम्ही जाणार नाही. निवडणुका लढविणे हा आमचा धंदा नाही. आम्ही केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी सभागृहात लाेकप्रतिनिधी हवेत म्हणून निवडणुका लढविल्या, असेही शेट्टी म्हणाले.

-----

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने