आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 04:36 PM2020-06-26T16:36:29+5:302020-06-26T16:39:54+5:30

ग्रामीण पोलीस अलर्ट; वारकºयांना रोखण्यासाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त 

A four-day curfew will be imposed in Pandharpur on the occasion of Ashadi Yatra | आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार

Next
ठळक मुद्दे- ग्रामीण पोलिसांची पंढरपुरात बैठक- आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचा असणार बंदोबस्त- १५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार

पंढरपूर : श्री. विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी २९ जून ते २ जुलैपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकºयांची गर्दी होऊ नये. यासाठी आषाढी यात्रा भरून देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाविकांना पंढरपुरात न येऊ देण्यासाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. तसेच पंढरपूर कडे येणाºया मार्गावर नाकाबंदी करण्यात आले आहे.

त्याचबरोबर पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किलोमीटर परिसरामध्ये संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. मात्र शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

Web Title: A four-day curfew will be imposed in Pandharpur on the occasion of Ashadi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.