शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 2:23 PM

रोजगार हमी योजनेंतर्गत कामे : चार वर्षात लावली ४ लाख ५० हजार ४८५ रोपं...

ठळक मुद्देनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावलीसिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत

सोलापूर : कोरोना काळात नैसर्गिक आणि कृत्रिम ऑक्सिजनची चर्चा घराघरात होतेय़ याचे महत्त्वही प्रत्येकाला कळून आले आहे. सोलापुरात नैसर्गिक ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न झाले आहेत. २०१६ ते २०२० या चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत विविध उपक्रमांतर्गत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात ४ लाख ५०,४८५ रोपं लावली़ त्यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात ३ लाख ९,२४५ रोपं जगली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़) चे इर्शाद शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली आहे़ हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभाग हे दोन्ही विभाग विविध माध्यमातून धडपड करीत आहेत़ याही काळात रोपांच्या लागवडीवर भर दिला आहे.

मागील चार वर्षांत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यात ऑक्सिजन वाढवणारी लिंब, सुबाभूळ, अंजन, खैरसह आवळा, सीताफळ आणि आंबा अशी फळ रोपं लावली आहेत. ही रोपं लावत असताना त्याचे नियोजनही केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात गंगाधर कणबस, आचेगाव, हत्तूर, घोडातांडा, माळकवठे, हत्तरसंग, बोरामणी, सलगर, औज मंद्रुप, भंडारकवठे या गावांमध्ये तर उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी, कौठाळी आणि सिद्धेश्वर वनविहारात रोपं लावली आहेत़ याशिवाय अक्कलकोट तालुक्यात दहिटणे, मैंदर्गी, कल्लप्पावाडी, सलगर, चुंगी, सातनदुधनी, मिरजगी, गळोरगी या गावांमध्ये वनविभागाच्या वतीने विविध रोपं लावण्यात आली आहेत़ 

वनविहारात लावली आंब्याची रोपंनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावली़ या शिवाय सिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत़ 

सोलापुरात वृक्षलागवड वाढवून वनाधित क्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न आहे़ वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर रोपं लावली आहेत़ चार वर्षांत ४ लाख ५०, ४८५ रोपं लावली़ ती जगवण्यासाठी वनखात्याचा प्रयत्न झाला़ आता राहिलेल्या रोपांना पाण्याची कमतरता जाणवणार नाही यासाठी नियोजन करतोय़ - इर्शाद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़), सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणSmart Cityस्मार्ट सिटी