शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाच महिन्यांपूर्वी भरलेले उजनी धरण झाले मायनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:22 IST

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग ...

ठळक मुद्देसध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे.

सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा असून, बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल, उपयुक्त पाणीसाठा ४९१ दशलक्ष घनमीटरवर येईल त्या वेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल. सध्या ९० क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी, २८० क्युसेक सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी, ३२०० क्युसेक इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे. येणाºया काळात नदीला पाणी सोडावे लागणार आहे. म्हणजेच पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीतच निवडणुकीचे वातावरण तापले असताना पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांना झगडावे लागणार आहे.

गेल्या वर्षी १२ मार्चला उजनी धरणात पाणीसाठा ७१.८१ टक्के एवढा होता. आजच्या दिवशी यावर्षी उजनी पाणीसाठा ३.८३ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा २.५५ टीएमसी इतका आहे. चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली परंतु पुणे जिल्ह्यातील पडलेल्या पावसामुळे उजनीवरील धरणे भरली आणि तिथून विसर्ग उजनीत सोडला गेला. त्याचा फायदा उजनी धरणाला झाला. सुरुवातीला पाणी नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे उजनी धरण झपाट्याने रिकामे झाले आहे. रोज एक टक्का पाणीसाठा उजनी धरणातील कमी होत असून, येत्या दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल.

उजनीची सद्यस्थिती

  • - एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर
  • - एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी
  • - टक्केवारी ३.८३ %
  • - एकूण टीएमसी ६५.७१
  • - उपयुक्त टीएमसी २.०५

विसर्ग

  • - कालवा ३२०० क्युसेक
  •  - बोगदा ६९० क्युसेक
  • - सीना-माढा उपसा सिंचन २८० क्युसेक
  • - दहिगाव उपसा सिंचन ९० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdroughtदुष्काळ