शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाच महिन्यांपूर्वी भरलेले उजनी धरण झाले मायनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:22 IST

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग ...

ठळक मुद्देसध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार

भीमानगर : गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये ११० टक्के भरलेले उजनी धरण पाच महिन्यांत मायनसमध्ये आले असून, रब्बी हंगामासाठी नदीचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. बाकीच्या सर्व योजनांना पाणी सुरू आहे.

सध्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच उपयुक्त पाणीसाठा असून, बोगद्याच्या तोंडाजवळ पाणी शिल्लक नसेल, उपयुक्त पाणीसाठा ४९१ दशलक्ष घनमीटरवर येईल त्या वेळेस बोगद्याचे पाणी बंद होईल. सध्या ९० क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी, २८० क्युसेक सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी, ३२०० क्युसेक इतका विसर्ग कालव्यातून सुरू आहे. येणाºया काळात नदीला पाणी सोडावे लागणार आहे. म्हणजेच पाण्यासाठी इथून पुढे सोलापूरकरांना संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीतच निवडणुकीचे वातावरण तापले असताना पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांना झगडावे लागणार आहे.

गेल्या वर्षी १२ मार्चला उजनी धरणात पाणीसाठा ७१.८१ टक्के एवढा होता. आजच्या दिवशी यावर्षी उजनी पाणीसाठा ३.८३ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा २.५५ टीएमसी इतका आहे. चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली परंतु पुणे जिल्ह्यातील पडलेल्या पावसामुळे उजनीवरील धरणे भरली आणि तिथून विसर्ग उजनीत सोडला गेला. त्याचा फायदा उजनी धरणाला झाला. सुरुवातीला पाणी नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे उजनी धरण झपाट्याने रिकामे झाले आहे. रोज एक टक्का पाणीसाठा उजनी धरणातील कमी होत असून, येत्या दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये प्रवेश करेल.

उजनीची सद्यस्थिती

  • - एकूण पाणीपातळी ४९१.३२० मीटर
  • - एकूण पाणीसाठा १८६०.९० दलघमी
  • - उपयुक्त पाणीसाठा ५८.०९ दलघमी
  • - टक्केवारी ३.८३ %
  • - एकूण टीएमसी ६५.७१
  • - उपयुक्त टीएमसी २.०५

विसर्ग

  • - कालवा ३२०० क्युसेक
  •  - बोगदा ६९० क्युसेक
  • - सीना-माढा उपसा सिंचन २८० क्युसेक
  • - दहिगाव उपसा सिंचन ९० क्युसेक
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdroughtदुष्काळ