शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पंधरा-पंधरा दिवस झाले रोहित्र मिळेना; पाणीसाठा असूनही पिके काेरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:06 IST

महावितरणचे दुर्लक्ष : चांगल्या पावसामुळे नदी-विहिरीत मुबलक पाणीसाठा

सुजल पाटील

सोलापूर : यंदा चांगला पाऊसमान झाल्यामुळे विहिरी, बोअर, नद्या, नाल्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी वेळेवर रोहित्र (ट्रान्सफर्मर) मिळत नसल्याने अनेक पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.  आठ ते पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने पिके कोरडी पडत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात रब्बीबरोबरच खरीपांची मोठया प्रमाणात पेरणी केली जाते. याशिवाय जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्राबरोबरच फळपिकांचेही क्षेत्र वाढले आहे. मागील चार ते पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांना यंदा चांगल्या पावसाने दिलासा दिला असला तरी महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे रोहित्रे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील शाखा कार्यालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. महावितरणकडून या शेतकर्‍यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

तक्रार करूनही प्रतीक्षेतचरोहित्र जळाल्याची तक्रारी स्थानिक कार्यालयात केल्यानंतर तेथील कर्मचारी बघू, करू अशी उत्तरे देतात, त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्याला कुठे न्याय मिळतो. पण तक्रार केल्यानतर सुध्दा किमान रोहित्र मिळण्यास किमान १० दिवस लागतातच.

खासगी दलाल गावागावात आम्ही तुम्हाला रोहित्र बदलून देऊ असे सांगून शेतकर्याकडून पैसे उकळणारे खासगी दलाल आता गावागावात दिसू लागले आहेत. त्यांचा महावितरणशी काहीही सबंध नसतानाही हे लोक बिनधास्तपणे शेतकर्याकडून पैसे वसूल करू लागल्याचेही सांगण्यात आले. 

वास्ताविक पाहता कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महावितरण सर्वेातोपरीने प्रयत्न करीत आहे. ऑईल व रोहित्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आमच्याकडे तक्रार आल्यास तीन ते चार दिवसातच आम्ही रोहित्र बदलून देतो.  - ज्ञानदेव पडळकर,  अधीक्षक अभियंता, महावितरण

रोहित्र बंद पडल्यानंतर उन्हाळ्यात किमान महिनाभराचा कालावधी लागत होता. आता त्यात थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तक्रार केल्यानंतर आधी पैसे भरा मगच रोहित्र बदलण्यात येईल असे सांगण्यात येते, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- संजीव पाटील, तक्रारदार शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात