शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा-पंधरा दिवस झाले रोहित्र मिळेना; पाणीसाठा असूनही पिके काेरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:06 IST

महावितरणचे दुर्लक्ष : चांगल्या पावसामुळे नदी-विहिरीत मुबलक पाणीसाठा

सुजल पाटील

सोलापूर : यंदा चांगला पाऊसमान झाल्यामुळे विहिरी, बोअर, नद्या, नाल्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी वेळेवर रोहित्र (ट्रान्सफर्मर) मिळत नसल्याने अनेक पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.  आठ ते पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने पिके कोरडी पडत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात रब्बीबरोबरच खरीपांची मोठया प्रमाणात पेरणी केली जाते. याशिवाय जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्राबरोबरच फळपिकांचेही क्षेत्र वाढले आहे. मागील चार ते पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांना यंदा चांगल्या पावसाने दिलासा दिला असला तरी महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे रोहित्रे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यातील शाखा कार्यालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. महावितरणकडून या शेतकर्‍यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा देण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ‘ऑटोस्विच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

तक्रार करूनही प्रतीक्षेतचरोहित्र जळाल्याची तक्रारी स्थानिक कार्यालयात केल्यानंतर तेथील कर्मचारी बघू, करू अशी उत्तरे देतात, त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर त्याला कुठे न्याय मिळतो. पण तक्रार केल्यानतर सुध्दा किमान रोहित्र मिळण्यास किमान १० दिवस लागतातच.

खासगी दलाल गावागावात आम्ही तुम्हाला रोहित्र बदलून देऊ असे सांगून शेतकर्याकडून पैसे उकळणारे खासगी दलाल आता गावागावात दिसू लागले आहेत. त्यांचा महावितरणशी काहीही सबंध नसतानाही हे लोक बिनधास्तपणे शेतकर्याकडून पैसे वसूल करू लागल्याचेही सांगण्यात आले. 

वास्ताविक पाहता कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महावितरण सर्वेातोपरीने प्रयत्न करीत आहे. ऑईल व रोहित्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आमच्याकडे तक्रार आल्यास तीन ते चार दिवसातच आम्ही रोहित्र बदलून देतो.  - ज्ञानदेव पडळकर,  अधीक्षक अभियंता, महावितरण

रोहित्र बंद पडल्यानंतर उन्हाळ्यात किमान महिनाभराचा कालावधी लागत होता. आता त्यात थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तक्रार केल्यानंतर आधी पैसे भरा मगच रोहित्र बदलण्यात येईल असे सांगण्यात येते, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- संजीव पाटील, तक्रारदार शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेतीFarmerशेतकरीwater shortageपाणीकपात